Students can find the best Marathi Balbharati Class 6 Solutions and Chapter 1 Question Answer बलसागर भारत होवो (गीत) for exam preparation.
Std 6 Marathi Balbharati Chapter 1 Question Answer बलसागर भारत होवो (गीत)
Maharashtra Board Solutions Class 6 Marathi Balbharati Chapter 1 बलसागर भारत होवो (गीत)
बलसागर भारत होवो (गीत) Question Answer
साने गुरुजी-(१८९९-१९५०) साने गुरुजींनी कथा, कविता, कादंबऱ्या असे विपुल ललित लेखन, तसेच वैचारिक लेखन केलेले आहे. ‘श्यामची आई’, ‘धडपडणारी मुले’, ‘भारतीय संस्कृती’, ‘गोड गोष्टी’, ‘सुंदर पत्रे’ इत्यादी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. हे गीत ‘स्फूर्तिगीते’ या पुस्तकातून घेतले आहे.
पराक्रम, ऐक्य, सेवा, त्याग आणि देशभक्ती यांच्यामधून आपला भारत देश अधिक शक्तिशाली व्हावा अशी अपेक्षा साने गुरुजींनी या समूहगीतात व्यक्त केली आहे. शिक्षकांसाठी : विदयार्थ्यांकडून समूहगीत तालासुरात म्हणून घ्यावे. समूहगीतांच्या ध्वनिफिती ऐकवाव्या.
Class 6 Marathi Balbharati Chapter 1 बलसागर भारत होवो (गीत) Question Answer
संकलित मूल्यमापण
कवितेवर आधारित प्रश्नोत्तरे
प्रश्न १.
कवितेच्या ओळी पूर्ण करा.
i. वैभवी देश चढवीन,
सर्वस्व त्यास अर्पीन
हा ……… संहारिन,
या बंधु ……..
उत्तर:
वैभवी देश चढवीन,
सर्वस्व त्यास अर्पीन
हा तिमिर घोर संहारिन,
या बंधु सहाय्याला हो ।
ii. करि दिव्या पताका घेऊ,
प्रिय भारत गीते गाऊ,
विश्वात ……….,
ही मा ……….।
उत्तर:
करि दिव्य पताका घेऊ,
प्रिय भारत गीते गाऊ,
विश्वात पराक्रम दावू,
ही माय निजपदा लाहो ।
iii. या उठा करू हो शर्थ,
संपादु दिव्य ………..,
हे जीवन………,
भाग्यसूर्य तळपत राहो।
उत्तर:
या उठा करू हो शर्थ,
संपादु दिव्य पुरुषार्थ,
हे जीवन ना तरी व्यर्थ,
भाग्यसूर्य तळपत राहो।
प्रश्न २.
एका वाक्यात उत्तरे लिहा.
i. कवीने कोणते कंकण हातात बांधले आहे?
उत्तर:
कवीने जनसेवेच्या व्रताचे कंकण हातात बांधले आहे.
ii. कोणता मंत्र जपून आपण देशसेवा करूया, असे कवी म्हणतो?
उत्तर:
ऐक्याचा मंत्र जपून आपण देशसेवा करूया, असे कवी म्हणतात.
iii. कवी कोणत्या अंधाराचा (तिमिराचा) नाश करणार आहे ?
उत्तर:
कवी पारतंत्र्यरूपी अंधाराचा नाश करणार आहे.
iv. काय केले नाही, तर आपले जीवन व्यर्थ ठरेल, असे कवीला वाटते?
उत्तरः
प्रयत्नांची पराकाष्ठा करून आपल्या भारतभूमीसाठी तेजस्वी असा पराक्रम केला नाही, तर आपले जीवन व्यर्थ ठरेल असे कवीला वाटते.
v. भारतमाता साऱ्या जगाला कोणता संदेश देईल, असे कवीने म्हटले आहे?
उत्तर:
भारतमाता साऱ्या जगाला शांतीचा संदेश देईल, असे कवीने म्हटले आहे.
भाषाभ्यास व व्याकरण
प्रश्न १.
समानार्थी शब्द लिहा.
- विश्व =
- वैभव =
- संहार =
- राष्ट्र =
- शर्य =
- जीवन =
- प्राण =
- सहाय्य =
- बल =
- भाग्य =
- सूर्य =
- सोने =
- कर =
उत्तर:
- जग, सृष्टी, जगत्
- समृद्धी, श्रीमंती
- नाश
- देश
- प्रयत्न
- आयुष्य
- जीव
- मदत
- शक्ती, ताकद
- नशीब
- रवी, भास्कर, दिनकर
- कनक, हिरण्य, सुवर्ण, हेम
- हात, हस्त
प्रश्न २.
विरुद्धार्थी शब्द लिहा.
- तिमिर ×
- शांती ×
- प्रिय ×
उत्तर:
- प्रकाश, उजेड
- अशांती, गोंगाट
- अप्रिय
प्रश्न ३.
शेवटचे अक्षर सारखे असणारे शब्द लिहा.
उत्तर:
- बांधियले, दिधले, उरले.
- चढवीन, अर्पीन, संहारिन, घेऊन, जोडून, जपून.
- घेऊ, गाऊ.
- राहो, लाहो.
- शर्थ, पुरुषार्थ, व्यर्थ.
- होईल, शोभेल, देईल.
आकारिक मूल्यमापन
मौखिक कार्य
प्रश्न १.
साने गुरुजींच्या चार पुस्तकांची नावे सांगा.
प्रश्न २.
देशभक्तिपर गीते शोधा आणि वर्गात त्यांचे सामूहिक गायन करा.
लेखी कार्य
प्रश्न १.
तुमच्या आवडत्या देशभक्तिपर गीताच्या चार ओळी तुमच्या वहीत लिहा.
(टीप: हा प्रश्न विदयार्थ्यांनी स्वतः सोडवावा.)
उपक्रम/प्रकल्प
प्रश्न १.
भारतीय सैन्याने आजवर लढलेल्या युद्धांची माहिती मिळवा.
प्रश्न २.
सैनिकाचे जीवनचित्रण करणाऱ्या कथा मिळवून वाचा.
(टीप: वरील उपक्रम/प्रकल्प विदयार्थ्यांनी स्वत: करावेत.)
बलसागर भारत होवो (गीत) कवितेचा भावार्थ
कवी साने गुरुजी यांनी ‘बलसागर भारत होवो’ या समूहगीताद्वारे पराक्रम, ऐक्य, सेवा, त्याग आणि देशभक्ती यांच्यामधून आपला भारत देश अधिक सामर्थ्यशाली व्हावा आणि संपूर्ण जगामध्ये दिमाखात शोभून दिसावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
या गीतात साने गुरुजी म्हणतात, देशसेवेच्या व्रताचे कंकण हातात बांधून मी सज्ज आहे. माझे प्राण आता फक्त देशसेवेसाठीच उरले आहेत. देशबांधवांच्या सेवेसाठी मी माझे संपूर्ण आयुष्य दिले आहे, अशी उदात्त भावना ते या गीतामधून व्यक्त करतात.
मी माझ्या देशाला सर्वोच्च वैभवाच्या शिखरावर घेऊन जाईन, त्यासाठी सर्वस्व अर्पण करेन. पारतंत्र्याचा अंधार नष्ट करेन. हे देशबांधवांनो! यासाठी मला तुमचे सहकार्य हवे आहे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
हे देशबांधवांनो! देश बलशाली बनवण्यासाठी आपण सर्वांनी हातात हात घेऊन, हृदयाला हृदय जोडून एकजुटीने कामाला लागूया. हातामध्ये तेजस्वी पताका घेऊन, आपण प्रिय भारतभूमीची गौरवगीते गाऊया. साऱ्या विश्वाला आपल्या सामर्थ्याची ओळख करून देऊया आणि भारतमातेला पूर्वीचे स्वातंत्र्य परत मिळवून देऊया. हे देशबांधवांनो! चला, आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करून स्वातंत्र्यरूपी विजय मिळवूया. अन्यथा आपले जगणेच व्यर्थ ठरेल.
आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमधून ही भारतभूमी महान होईल, वैभवाने शोभिवंत होईल, साऱ्या विश्वाला शांतीचा संदेश देईल. तो सोन्याचा दिवस लवकरच येऊ दे, असा आशावाद साने गुरुजी या गीतातून व्यक्त करतात.
बलसागर भारत होवो (गीत) शब्दार्थ
बलसागर भारत होवो (गीत) टीप
कंकण | हातात घालायचे आभूषण, बांगडी. येथे अर्थ- देशसेवेच्या प्रतिज्ञेशी एकनिष्ठ राहण्यासाठी हाता बांधलेले प्रतिकात्मक कडे. |