Students can find the best Marathi Balbharati Class 7 Solutions and Chapter 20 Question Answer विचारधन for exam preparation.
Std 7 Marathi Balbharati Chapter 20 Question Answer विचारधन
Maharashtra Board Solutions Class 7 Marathi Balbharati Chapter 20 विचारधन
विचारधन Question Answer
महर्षी धोंडो केशव कर्वे : हे ‘अण्णासाहेब कर्वे’ म्हणून ओळखले जात. समाजसुधारणेच्या कामात ते हिरिरीने भाग घेत. हिंगणे स्त्रीशिक्षण संस्था, एस. एन. डी. टी. महिला विदयापीठ या संस्था त्यांच्या प्रयत्नांनी नावारूपाला आल्या. त्यांनी केलेल्या समाजसेवेच्या गौरवार्थ आपल्या भारत सरकारने त्यांना ‘भारतरत्न’ हा किताब दिला.
त्यांचे विचार- ‘विदयार्थी व विद्यार्थिनी हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ आहेत. त्यांनी दोन गोष्टी सतत ध्यानी बाळगाव्यात.
(१) गतानुगतिक वृत्ती टाकून स्वतंत्र विचार करायला त्यांनी शिकावे, मात्र हे लक्षात ठेवले पाहिजे, की आपल्याला स्वतंत्र विचार करण्याचा जसा हक्क आहे तसाच तो इतरांनाही आहे.
(२) मनाचा समतोलपणा राखावा.
केव्हाही मनाचा समतोल ढळता कामा नये. हा तोल सावरणे ही कठीण गोष्ट आहे. हा तोल सांभाळला नाही, म्हणूनच जगात मोठमोठे अनर्थ घडून आलेले आहेत. मनाचा समतोल सांभाळून व भावनांच्या आहारी न जाता, आपल्याला पटलेली गोष्ट धैर्याने आचरणात आणणारी माणसेच आपले हे स्वराज्य टिकवू शकतील.
समतेचे तत्त्व आचरणात आणणारी व भेदाभेद न मानणारी माणसे मोठ्या प्रमाणात झाल्याशिवाय या देशाचा उद्धार होणार नाही, अशी माझी ठाम खात्री आहे.’
नामदार गोपाळ कृष्ण गोखले : हे लोकमान्य टिळकांचे समकालीन. उदारमतवादी म्हणून ते प्रसिद्ध होते. विधायक कार्य करणाऱ्या अनेक संस्थांना त्यांनी चालना दिली. त्यांनी ‘सव्र्हेंट्स ऑफ इंडिया सोसायटी’ नावाची संस्था स्थापन केली. ‘भारत सेवक समाज’ या नावाने आता ती परिचित आहे. गोपाळ कृष्ण गोखले यांना महात्मा गांधी गुरुस्थानी मानत.
त्यांचे विचार- ‘आज सर्वांत अधिक गरज असेल, तर ती देशाच्या चारी कोपऱ्यांत ऐक्याची नि देशभक्तीची शिकवण देणाऱ्या कार्यकर्त्यांची. देशप्रेम इतके पराकोटीला पोहोचायला हवे, की केवढाही त्याग करायला लागो तो आनंददायी वाटला पाहिजे. आज त्यागाची अधिक जरूर आहे. बोलणे नको, काम हवे! आपण सारे भाऊ भाऊ आहोत.
आपण सारे हिंदी आहोत. धर्म आणि पंथ यांत गुरफटून जाऊ नका. समाजाची सर्वांगीण उन्नती होण्यासाठी राष्ट्रीय चारित्र्यही हवे. आज नैतिक सामर्थ्य कमी होत आहे. संकुचित भावना आणि क्षुद्र विचार यांची मगरमिठी न सोडवू तर भाग्योदय कसा होणार? आपल्या सर्व कामांत शिस्त, स्वार्थत्याग व कुशलता हे गुण प्रामुख्याने हवेत.
राष्ट्राची उभारणी हे सोपे काम नाही. त्यासाठी सबंध आयुष्य दयावे लागते. आपण खत होऊया, भावी पिढी पीक घेईल.’
Class 7 Marathi Balbharati Chapter 20 विचारधन Question Answer
पाठाधारित प्रश्नोत्तरे
प्रश्न १.
खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
i. महर्षी धोंडो केशव कर्वे यांना कोणत्या नावाने ओळखत ?
उत्तर:
महर्षी धोंडो केशव कर्वे यांना ‘अण्णासाहेब कर्वे’ या नावाने ओळखत.
ii. महर्षी कर्वेंच्या प्रयत्नांतून कोणत्या शैक्षणिक संस्था आकाराला आल्या?
उत्तर:
हिंगणे स्त्रीशिक्षण संस्था व एस. एन. डी. टी. महिला विदयापीठ या संस्था महर्षी कर्वेच्या प्रयत्नांतून आकाराला आल्या.
iii. भारत सरकारने महर्षी कर्वेंना कोणत्या सन्मानाने गौरवले?
उत्तर:
भारत सरकारने महर्षी कर्वेंना ‘भारतरत्न’ या सर्वोच्च किताबाने गौरवले.
iv. महर्षी कर्वेच्या मते विदयार्थी राष्ट्राचे कोण आहेत?
उत्तर:
महर्षी कर्वेंच्या मते विदयार्थी राष्ट्राचे भावी आधारस्तंभ आहेत.
v. महर्षी कर्वेंनी विदयार्थ्यांना कोणती वृत्ती टाकून दयायला सांगितली आहे ?
उत्तर:
महर्षी कर्वेंनी विदयार्थ्यांना गतानुगतिक वृत्ती म्हणजेच पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार विचार करणे टाकून देण्यास सांगितले आहे.
vi. महर्षी कर्वेंच्या मते, स्वराज्य टिकवणे कोणाला शक्य आहे ?
उत्तर:
महर्षी कर्वेच्या मते, जे मनाचा समतोल सांभाळून भावनांच्या आहारी जाणे टाळतील व पटलेली गोष्ट धैर्याने आचरणात आणतील त्यांनाच स्वराज्य टिकवणे शक्य आहे.
vii. देशाचा उद्धार केव्हा होईल असे महर्षी कर्वेंना वाटते?
उत्तर:
जेव्हा मोठ्या प्रमाणात माणसे समतेचे तत्त्व आचरणात आणतील व भेदाभेद मानणे बंद करतील तेव्हा देशाचा उद्धार होईल असे महर्षी कर्वेंना वाटते.
viii. गोपाळ कृष्ण गोखले हे कोणाचे समकालीन होते ?
उत्तर:
गोपाळ कृष्ण गोखले हे लोकमान्य टिळकांचे समकालीन होते.
ix. गोपाळ कृष्ण गोखले यांना कोण गुरुस्थानी मानत?
उत्तर:
महात्मा गांधी हे गोपाळ कृष्ण गोखले यांना गुरुस्थानी मानत.
x. गोपाळ कृष्ण गोखले यांनी स्थापन केलेल्या संस्थेचे नाव काय?
उत्तर:
‘सर्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी’ या नावाने गोपाळ कृष्ण गोखले यांनी संस्था स्थापन केली, जी आता ‘भारत सेवक समाज’ या नावाने ओळखली जाते.
xi. गोपाळ कृष्ण गोखले यांच्या मते, देशाला कशाची सर्वाधिक गरज आहे?
उत्तरः
गोपाळ कृष्ण गोखले यांच्या मते, देशात ऐक्याची व देशभक्तीची शिकवण देणाऱ्या कार्यकर्त्यांची सर्वाधिक गरज आहे. देशासाठी त्याग करणाऱ्या जनतेची गरज आहे.
xii. ऐक्याच्या संदर्भात गो. कृ. गोखले यांनी कोणती जाणीव उल्लेखली आहे ?
उत्तर:
देशामध्ये आपण सारे भाऊ भाऊ आहोत, सारे हिंदी आहोत ही जाणीव रुजून जनतेने धर्म आणि पंथ यांच्या पलीकडे जाण्याची गरज असल्याचे गो. कृ. गोखले यांनी उल्लेखले आहे.
xiii. समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी काय आवश्यक आहे?
उत्तर:
समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी राष्ट्रीय चारित्र्य आवश्यक आहे.
xiv. गो. कृ. गोखले यांच्या मते, भारतीय कशाच्या मगरमिठीत सापडले आहेत?
उत्तर:
गो. कृ. गोखले यांच्या मते, भारतीय संकुचित भावना व क्षुद्र विचार यांच्या मगरमिठीत सापडले आहेत.
xv. आपल्या सर्व कामांत कोणते गुण असायला हवेत?
उत्तरः
आपल्या सर्व कामांत शिस्त, स्वार्थत्याग व कुशलता हे गुण असायला हवेत.
xvi. राष्ट्राच्या उभारणीसाठी काय करावे लागते?
उत्तर:
राष्ट्राच्या उभारणीसाठी सबंध आयुष्य दयावे लागते, देशसेवेस अर्पण करावे लागते.
xvii. ‘आपण खत होऊया, भावी पिढी पीक घेईल’ याचा अर्थ स्पष्ट करा.
उत्तर:
या विधानाद्वारे गो. कृ. गोखले उपदेश करत आहेत, की आपण देशसेवेच्या रूपांतील खत होऊया आणि या देशाची मशागत करूया, यामुळे आपल्या भावी पिढ्यांना स्वातंत्र्याचे पीक घेता येईल. स्वातंत्र्याची फळे चाखता येतील.
आकारिक मूल्यमापन
उपक्रम / प्रकल्प
प्रश्न १.
स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होणाऱ्या नेत्यांची माहिती मिळवा. त्यांपैकी एका स्वातंत्र्यसेनानीचे थोडक्यात चरित्र लिहा.
प्रश्न २.
समाजसुधारणेसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या संत गाडगे बाबा यांच्याविषयी माहिती मिळवा व तुमच्या शब्दांत मांडा.
(वरील उपक्रम विदयार्थ्यांनी स्वतः करावेत.)
विचारधन पाठाचा परिचय:
‘विचारधन’ या पाठात थोर समाजसेवक महर्षी धोंडो केशव कर्वे व उदारमतवादी समाजसेवक नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे विचार थोडक्यात मांडले आहेत. यांच्यासारख्या थोर व्यक्तींचे विचाररूपी धन आपल्याला खऱ्या अर्थाने समृद्ध करते.
विचारधन शब्दार्थ
विचारधन वाकप्रचार व त्यांचे अर्थ
आहारी जाणे. | एखाद्या गोष्टीचा अतिरेक करणे. |
उद्धार होणे. | प्रगती होणे. |
किताब देणे. | सन्मानित करणे. |
चालना देणे. | प्रोत्साहन देणे, मदत करणे. |
नावारूपाला येणे. | स्थापन होऊन प्रसिद्ध होणे. |
पराकोटीला पोहोचणे. | सर्वांत उंच पातळीस पोहोचणे, खूप वाढणे. |
हिरिरीने भाग घेणे. | उत्साहाने सहभागी होणे. |
विचारधन टीप
भारतरत्न | भारत सरकारतर्फे दिला जाणारा, अत्युच्च आदराचा सन्मान / पुरस्कार. ‘आपण खत होऊया, भावी पिढी पीक घेईल? आपण विचार आज आपल्या कृतीतून समाजात रुजवूया, म्हणजे आपल्या येणाऱ्या पिढ्यांना त्यातून उत्तम फायदे प्राप्त होतील. |