Class 7 Marathi Balbharati Chapter 17 Question Answer थेंब आज हा पाण्याचा (कविता)

Students can find the best Marathi Balbharati Class 7 Solutions and Chapter 17 Question Answer थेंब आज हा पाण्याचा (कविता) for exam preparation.

Std 7 Marathi Balbharati Chapter 17 Question Answer थेंब आज हा पाण्याचा (कविता)

Maharashtra Board Solutions Class 7 Marathi Balbharati Chapter 17 थेंब आज हा पाण्याचा (कविता)

थेंब आज हा पाण्याचा (कविता) Question Answer

प्रश्न ९.
कवयित्रीने असे का म्हटले असावे ते तुमच्या शब्दांत लिहा.

(अ) या मोत्यांचा (पाण्यांचा) संचय कर.
उत्तरः
कवयित्रीने पाण्याच्या थेंबांना मोत्यांची उपमा दिली आहे. सध्या पाण्याची समस्या फार बिकट झालेली आहे. मानवाने तंत्रज्ञानामध्ये खूप प्रगती केली आहे; पण पाण्यासाठी दुसरा पर्याय मानवाकडे नाही. जगण्यासाठी पाणी अत्यावश्यक आहे. तेव्हा पावसाच्या पाण्याचा साठा करण्याचा सल्ला कवयित्री देत आहे.

(आ) निसर्गाला जे कळते ते माणसाला कळत नाही.
उत्तर:
कवयित्री म्हणतात, की पाण्याचे मोल निसर्गाला समजले आहे; परंतु मानवाला पाण्याची किंमत समजली नाही. निसर्ग माती, झरे, नदी, पाणी हे जपण्याचा प्रयत्न करतो. प्राणी, पक्षी, वृक्ष मानवाप्रमाणे पाण्याचा अपव्यय करत नाहीत, म्हणून कवयित्री म्हणते, की निसर्गाला पाण्याचे जतन करण्याचे महत्त्व कळाले आहे; पण पाण्याचा बेसुमार वापर करणाऱ्या माणसाला मात्र ते कळले नाही.

प्रश्न २.
खाली दिलेल्या अर्थाच्या ओळी कवितेतून शोधून लिहा.

(अ) आकाशातून पडणाऱ्या पावसाच्या थेंबाने धान्य पिकते.
उत्तर:
आभाळातिल या मोत्याने मातीमधुनी पिकती मोती

(आ) मनुष्य खणखणत वाजणाऱ्या नाण्यांचा तिजोरीत संग्रह करतो.
उत्तरः
संचय करता तिजोरीतल्या, खणखणत्या त्या नाण्यांचा

(इ) निसर्गाचे मोल न जाणणे हे स्वतःला फसवण्यासारखे आहे.
उत्तर:
कशास ऐसा वेडाचाळा, स्वत: होऊनी ठगण्याचा

Class 7 Marathi Balbharati Chapter 17 Question Answer थेंब आज हा पाण्याचा (कविता)

प्रश्न ३.
संकल्पना स्पष्ट करा.

(अ) आभाळातील मोती.
उत्तर:
कवितेत पावसाच्या थेंबांना आभाळातील मोती म्हटले आहे. मोती हा जितका मौल्यवान असतो तितकेच जीवनासाठी पाणी अमूल्य आहे. त्या पाण्याचा थेंब अन् थेंब मोत्याप्रमाणेच मौल्यवान आहे व पाण्याचे थेंब दिसतानाही मोत्याप्रमाणे दिसतात.

(आ) मातीतील मोती.
उत्तर:
कवयित्रीने शेतातून पिकणाऱ्या धान्याला मातीमधून पिकणारे मोती म्हटले आहे. जगण्यासाठी माणसाला पाण्याप्रमाणेच अन्नाची आवश्यकताही असते, त्यामुळे सोने, हिरे-मोती यांपेक्षा धान्य अधिक मौल्यवान आहे, म्हणून धान्यास ‘मोती’ असे म्हटले आहे.

(इ) मोत्यांचा संचय.
उत्तर:
कवितेत कवयित्रीने पावसाच्या थेंबांना मोती असे म्हटले आहे. सध्या मानवापुढे पाणी टंचाईची समस्या उभी आहे. अशावेळी पावसाचे पाणी साठवल्यास हा प्रश्न सोडवता येईल, म्हणून कवयित्री पावसाचे पाणी साठवण्याचा म्हणजेच मोत्यांचा संचय करण्याचा संदेश देते.

(ई) बहुमोल थेंब.
उत्तर:
बहुमोल म्हणजे खूप मौल्यवान. कवितेत पावसाच्या, पाण्याच्या थेंबांना बहुमोल म्हटले आहे. माणसाने जरी सोने-चांदी यांना मौल्यवान मानले असले, तरी जीवनास अत्यंत आवश्यक असे पाणी आहे. पाण्याशिवाय जीवन जगणे शक्यच नाही, म्हणून ते इतर कोणत्याही वस्तूपेक्षा अधिक मोलाचे आहे.

प्रश्न ४.
खाली दिलेल्या ओळींतील विचार सांगा.

तहानेसाठी सांग पुरे का घोट तुला रे सोन्याचा ?
आभाळातिल बहुमोलाचा, थेंब आज हा पाण्याचा ।।
उत्तर:
‘थेंब आज हा पाण्याचा’ या कवितेत पाण्याचे महत्त्व विशद करताना कवयित्री सुनंदा भावसार म्हणतात, “ अरे मानवा तू सोन्याला इतके जपतोस, इतके मोलाचे मानतोस; परंतु ते सोने तुझी तहान भागवू शकणार नाही, त्यासाठी पाण्याचीच आवश्यकता लागणार आहे, त्यामुळे पावसाचे हे थेंब बहुमोलाचे आहेत. त्यातून आपले जीवन फुलणार आहे. ”

प्रश्न ५.
माणसाने निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. या वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
उत्तर:
माणूस निसर्गाकडे कायमस्वरूपी मोफत मिळालेली अक्षय मालमत्ता म्हणून पाहतो. उपलब्ध नैसर्गिक घटकांचा आपल्याला अधिकाधिक फायदा कसा करून घेता येईल याचाच विचार आपण करत असतो; परंतु निसर्गालाही मर्यादा आहेत आणि त्याचा स्रोतही आटू शकेल याचा विचारच मानवाने केलेला नाही. स्वतः मानवही या निसर्गाचा भाग आहे. याचा मानवाला विसर पडला आहे. निसर्गाकडे संवर्धन करण्याच्या दृष्टीने पाहणे गरजेचे आहे. पाणी, माती, इतर प्राणिमात्र यांचे संवर्धन केले, तरच मानवी जीवन टिकू शकेल हा दृष्टिकोनातील बदल या वाक्यातून अपेक्षित आहे.

प्रश्न ६.
फरक स्पष्ट करून तक्ता पूर्ण करा.
Class 7 Marathi Balbharati Chapter 17 Question Answer थेंब आज हा पाण्याचा (कविता) 3
उत्तर:

माणसाचे धन निसर्गाचे धन
कोणते नाणी, सोने पाणी, धान्य
कोठे ठेवतात तिजोरीमध्ये पाणी आभाळात, धान्य मातीत
उपयोग वस्तू विनिमयासाठी तहान, भूक या मूलभूत गरजा भागवण्यासाठी

खेळूया शब्दांशी

(अ) खालील शब्दांचे अर्थ समजून घेऊन त्यांचा वाक्यांत उपयोग करा.

उदा., मोल- बहुमोल, अनमोल.
मोल – मातीमोल, कवडीमोल.
उत्तर:
• मोल- बहुमोल, अनमोल.

i. बहुमोल – खूप मोलाचे.
उत्तर:
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात गांधीजींचे कार्य बहुमोलाचे आहे.

ii. अनमोल – अमूल्य, मूल्य लावता येणार नाही इतके महत्त्वाचे.
उत्तर:
जीवन अनमोल आहे.

• मोल – मातीमोल, कवडीमोल.

ii. मातीमोल – निरुपयोगी.
उत्तरः
अवेळी आलेल्या पावसाने शेतकऱ्याचे कष्ट मातीमोल झाले.

ii. कवडीमोल – मूल्य फार कमी होणे.
उत्तर:
आर्थिक मंदीमुळे ईलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू रस्तोरस्ती कवडीमोलाने विकल्या जाऊ लागल्या.

Class 7 Marathi Balbharati Chapter 17 Question Answer थेंब आज हा पाण्याचा (कविता)

(आ) माती – मोती अशा शब्दांच्या अर्थात केवळ एका मात्रेमुळे खूप फरक होतो. अशा शब्दांच्या जोड्या शोधा व लिहा.
उत्तर:

  1. जाडी – जोडी
  2. पाटी – पोटी
  3. पाती – पोती
  4. राख – रोख
  5. पाट – पोट
  6. लाट – लोट
  7. माल – मोल
  8. टाळ – टोळ
  9. दान – दोन
  10. घाट – घोट

प्रकल्प

(१) सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांच्या दुतर्फा पाणीबचतीच्या संदर्भात काही संदेश लिहिलेले असतात. त्यांचा संग्रह करा. त्यांतील तुम्हांला आवडलेल्या संदेशाचे फलक तयार करून शाळेच्या परिसरात लावा.
(हा उपक्रम विदयार्थ्यांनी स्वतः करावा.)

(२) ‘निसर्ग वाचवा’ याविषयी घोषवाक्ये तयार करून खालील फलकांवर लिहा.
Class 7 Marathi Balbharati Chapter 17 Question Answer थेंब आज हा पाण्याचा (कविता) 4
उत्तरः
Class 7 Marathi Balbharati Chapter 17 Question Answer थेंब आज हा पाण्याचा (कविता) 2

लिहिते होऊया.

• पाऊस पडलाच नाही, तर… कल्पना करा. खालील मुद्दयांच्या आधारे निबंधलेखन करा.

(१) पाण्याचा दुष्काळ.
(२) दैनंदिन जीवनावर होणारे परिणाम.
(३) शेती व उदयोगधंदे यांच्यावर होणारा परिणाम.
(४) नदी, नाले, विहिरींची स्थिती.
(५) सजीवांवर होणारा परिणाम.
उत्तर:
पाऊस पडला नाही, तर…

शाळा सुरू होण्यापूर्वीचा शेवटचा रविवार. आई-बाबा दोघांनाही सुट्टी असल्याने आम्ही सर्वांनी मिळून संध्याकाळी सिनेमाला जाण्याचा बेत आखला होता; परंतु सकाळपासूनच वातावरण ढगाळ होते व दुपारी जेवणाच्या वेळेस अचानक जोराचा वारा सुटला, ढग गडगडू लागले व पाऊस सुरू झाला ! साधासुधा नव्हे, तर चांगलाच मुसळधार पाऊस ! संध्याकाळ होऊ लागली तसतशी मी सिनेमासाठी अस्वस्थ होऊ लागले; पण पाऊस काही थांबेना ! शेवटी बाबांनी बाहेर जाण्याचा बेतच रद्द केला. असा राग आला त्या पावसाचा ! मनात विचार आला असे सर्वांचे बेत उडवून लावणारा पाऊस पडलाच नाही, तर…

सिनेमाला जाता येईल; पण पिण्याच्या पाण्याचे काय? ते कोठून आणणार ? सर्वत्र दुष्काळ पसरेल. पिण्यासाठी, अन्न शिजवण्यासाठी, कपडे-भांडी धुण्यासाठी, स्वच्छतेसाठी अशा कितीतरी कामांसाठी आपल्याला रोज पाणी लागते. पाणी नसेल, तर ही सर्व कामे अडणार. सर्वत्र अस्वच्छता पसरेल. शाळा, रुग्णालये, कचेऱ्या, सर्व सार्वजनिक ठिकाणे पाण्याअभावी ठप्प होतील. डॉक्टर, इंजिनीयर, शिक्षक, शास्त्रज्ञ सर्वांचीच कामे पाण्यावाचून अडून राहतील. प्रगत तंत्रज्ञानही पाण्याची कमतरता भरून काढू शकणार नाही.

फक्त दैनंदिन जीवनच नव्हे, तर शेती व उदयोगधंदेही पाण्याअभावी कसे चालणार? शेतात पिके फुलण्यासाठी जशी शेतकऱ्याची मेहनत महत्त्वाची असते तितकेच पाणीही. पाण्याअभावी शेतकरी तरी काय करणार? उदयोगधंदयांनाही कारखान्यात माल तयार करण्याच्या प्रकियेत पाण्याची गरज लागतेच. पाण्याच्या कमतरतेमुळे सर्व कारखाने बंद पडतील. कशाचेच उत्पादन होऊ शकणार नाही. या सर्वांचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर तर होईलच, त्याचबरोवर देशाच्या, जगाच्या प्रगतीवरही होईल. देशाची संपूर्ण अर्थव्यवस्थाच कोलमडून जाईल.

नदी, नाले, तलाव, विहिरी सर्वच आटून जातील. जलचर पाण्याशिवाय मृत्युमुखी पडतील. याचा परिणाम अन्नसाखळीवर होईल, यामुळे फक्त जलचरच नव्हे, तर संपूर्ण सजीवसृष्टी धोक्यात येईल. वृक्ष, प्राणी- पक्षी व मानवसुद्धा पाण्याशिवाय तग धरू शकणार नाहीत. तेव्हा पाऊस नाही, तर पाणी नाही, पाणी नाही, तर जीवन नाही; त्यामुळे पाऊस न पडण्याची कल्पनाही नकोच!

विचार करा.सांगा

Class 7 Marathi Balbharati Chapter 17 Question Answer थेंब आज हा पाण्याचा (कविता) 5

  • पाणी कसे तयार होते ?
  • पाणी कोठे साठवले जाते?
  • पाण्याचा वापर कशाकशासाठी होतो ?
  • जलप्रदूषण म्हणजे काय?
  • जलप्रदूषणाची कारणे कोणती?
  • जलप्रदूषण रोखण्यासाठी काय करावे? असे तुम्हांला वाटते?
  • जलसंवर्धनासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल ?

शिक्षकांसाठी : विदयार्थ्यांकडून वेगवेगळ्या विषयांवर आधारित घोषवाक्ये, सूचना सुवाच्य अक्षरांत लिहून घ्याव्यात. वर्गात किंवा शाळेच्या परिसरात लावाव्यात.

आभारपत्र

• सुमितच्या शाळेत १४ नोव्हेंबर रोजी बालदिनाचे आयोजन करण्यात आले होते. सुमित पडवळ शाळेतील सांस्कृतिक विभागाचा विदयार्थी प्रतिनिधी आहे. बालदिनाच्या कार्यक्रमप्रसंगी अध्यक्ष म्हणून उपस्थित असणाऱ्या डॉ. हेमंत साळवे (प्राचार्य) यांचे आभार मानण्यासाठी सुमितने त्यांना पत्र पाठवले आहे. ते अभ्यासा.

Class 7 Marathi Balbharati Chapter 17 Question Answer थेंब आज हा पाण्याचा (कविता) 6

• जर तुम्हांला एखादया कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन करायचे असेल, तर कोणत्या गोष्टी विचारात घ्याल, त्याचे सादरीकरण कसे कराल, त्याचा आराखडा तयार करा.
उत्तर:
मला एखादया कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन करायचे झाल्यास मी खालील गोष्टी विचारात घेईन –

  1. सर्वप्रथम कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचे त्यांच्या उपस्थितीसाठी आभार मानेन.
  2. कार्यक्रमाचे आयोजक, अर्थसाहाय्यक यांचे आभार मानेन.
  3. कार्यक्रम पार पाडण्यात ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले असेल त्यांचे आभार मानेन.
  4. कोणाचे नाव राहून गेले असल्यास त्याबद्दल क्षमा मागून त्यांचेही आभार मानेन.
  5. कार्यक्रम ज्यांच्यामुळे रंगतदार झाला त्या प्रेक्षकांचे किंवा श्रोत्यांचे उपस्थितीबद्दल आभार माने..
  6. सर्वांत शेवटी कार्यक्रम संपल्याचे जाहीर करेन.

अशाप्रकारे, कार्यक्रमाची आखणी ते तो कार्यक्रम पार पडण्यात साहाय्य केलेल्या सर्वांचे आभार मानण्याची दक्षता घेईन व नम्रतेने सर्वांची नावे घेऊन त्यांचे आभार मानेन.

Class 7 Marathi Balbharati Chapter 17 Question Answer थेंब आज हा पाण्याचा (कविता)

• आंतरशालेय क्रीडामहोत्सवात धावण्याच्या स्पर्धेत तुमच्या मित्राने / मैत्रिणीने प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्याचे / . तिचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.
उत्तर:
अदिती काळे
विष्णू सदन,
विलेपार्ले,
मुंबई-४०००५७.
दिनांक : २६ डिसेंबर, २०१७

प्रिय नेहा,
सप्रेम नमस्कार.

सर्वप्रथम आंतरशालेय क्रीडामहोत्सवात धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल तुझे हार्दिक अभिनंदन ! आज सकाळीच वर्तमानपत्रात बातमी वाचली. खरंच खूप आनंद झाला. पुण्यातले शाळेचे दिवस पुन्हा नव्याने आठवले. तू सलग तीन वर्षे धावणाऱ्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला होतास. तुझा धावण्याचा वेग पाहून वर्गातील काहीजण तुला पी. टी. उषा म्हणू लागले होते. त्यांचे बोलणे तू आज सिद्ध करून दाखवले आहेस. माझ्या आई-वडिलांना तुझे हे यश पाहून खूप आनंद झाला. त्यांनीही तुला शुभेच्छा दिल्या आहेत. तुझा आम्हां सर्वांना खूप अभिमान वाटतो. तू पुढेही अशीच प्रगती करत राहा हीच सदिच्छा!

येत्या मे महिन्यात मी पुण्याला येणार आहे तेव्हा धमाल करूच ! तुझ्या आई-बाबांना माझा नमस्कार सांग. पुन्हा एकदा तुझे मनापासून अभिनंदन !

तुझी मैत्रीण,
अदिती

आपण समजून घेऊया

• खालील तक्त्याचे निरीक्षण करा. शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.
Class 7 Marathi Balbharati Chapter 17 Question Answer थेंब आज हा पाण्याचा (कविता) 7
मराठी वर्णमालेचा म्हणजे अक्षरांचा अभ्यास तुम्ही केला आहे. त्या अक्षरांचा वापर करून आपण शब्द लिहितो हे तुम्हांला माहीत आहे. आपण जे बोलतो ते शब्द ध्वनींनी बनलेले असतात. अक्षरे म्हणजे या ध्वनींसाठीची चिन्हे असतात.

ध्वनींचे दोन प्रकार असतात – स्वर आणि व्यंजने. आता आपण मराठी भाषेतील स्वर आणि व्यंजने पाहणार आहोत.

मराठीत अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लृ, ए, ऐ, ओ, औ हे स्वर आहेत. अलीकडे मराठीत इंग्रजी शब्दांचा वापर सुरू झाल्यामुळे अॅ, ऑ या स्वरांचाही समावेश करण्यात आला.

‘लृ’ हा स्वर मराठीत फारसा वापरला जात नाही.
क्, ख्, ग्, घ्, ङ्
च्, छ्, ज्, झ्, ञ
ट्, ठ्, ड्, ढ्, ण्
त्, थ्, द्, ध्, न्,
प्, फ्, ब्, भ्, म्
य्, र्, ल्, व्, श्, ष्, स्, ह्, ळ् ही व्यंजने आहेत.
क्ष, ज्ञ ही संयुक्तव्यंजने आहेत.

प्रत्येक ध्वनीसाठी एकच अक्षर असते असे तुम्हांला वाटते का? एका अक्षराचा एकच उच्चार होतो का?

• हे शब्द उच्चारून पाहा.
चंद्र चांदणे
जीजोबा
झाकास
असे आणखी शब्द मिळवा.

Class 7 Marathi Balbharati Chapter 16 थेंब आज हा पाण्याचा Question Answer

पाठाधारित प्रश्नोत्तरे

प्रश्न १.
कंसातील योग्य पर्याय शोधून रिकाम्या जागा भरा.

  1. ……….. तिल बहुमोलाचा, थेंब आज हा पाण्याचा. (आकाशा, आभाळा, नभा)
  2. या मोत्यांचा संचय कर तू, प्रश्न तुझ्या रे …….. (आयुष्याचा, वसुंधरेचा, जीण्याचा)
  3. आभाळातिल ह्या मोत्याने मातीमधुनी पिकती ……. (मोती, सोने, धान्य)
  4. तहानेसाठी सांग पुरे का घोट तुला रे ………. (पाण्याचा, सोन्याचा, जगण्याचा)

उत्तर:

  1. आभाळा
  2. जीण्याचा
  3. मोती
  4. सोन्याचा

प्रश्न २.
सत्य की असत्य ते लिहा.

  1. झऱ्याच्या सरीतून मोतीरूपाने पाणी येत आहे.
  2. आभाळातील मोत्यांप्रमाणे मातीमधूनही मोती पिकत आहेत.
  3. तिजोरीमध्ये नाण्यांचा संचय केला जातो.
  4. तहान भागवण्यासाठी सोन्याचा घोट पुरेसा आहे.

उत्तरः

  1. असत्य
  2. सत्य
  3. सत्य
  4. असत्य

प्रश्न ३.
एका शब्दात उत्तरे लिहा.

  1. जिच्या हातून मोत्यांची माळ बनवताना ती निसटून जाते –
  2. पाण्याचे मोल जाणणारा –
  3. तिजोरीत खणखणणारी –

उत्तर:

  1. परी
  2. निसर्ग
  3. नाणी

Class 7 Marathi Balbharati Chapter 17 Question Answer थेंब आज हा पाण्याचा (कविता)

प्रश्न ४.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

i. काय बहुमोल आहे?
उत्तर:
आभाळातील पाण्याचा थेंब बहुमोलाचा आहे.

ii. जलरूपी मोत्यांचा संचय करणे का गरजेचे आहे ?
उत्तर:
पाण्याचा प्रश्न हा जीवनाचा प्रश्न असल्याने जलरूपी मोत्यांचा संचय करणे गरजेचे आहे.

iii. पाण्यामुळे मातीमधून कोणते मोती पिकतात?
उत्तर:
पाण्यामुळे मातीमधून धान्यरूपी मोती पिकतात.

iv. माणसाने कोणता दृष्टिकोन बदलला पाहिजे?
उत्तर:
माणसाने निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे.

v. तहान कशाने भागणार नाही ?
उत्तर:
सोन्याने, संपत्तीने तहान भागणार नाही.

प्रश्न ५.
थोडक्यात उत्तरे लिहा.
(टीप: खालील प्रत्येक उत्तराच्या सुरुवातीस ही प्रस्तावना लिहिता येऊ शकते.
प्रस्तावना: कवयित्री सुनंदा भावसार यांच्या ‘थेंब आज हा पाण्याचा’ या कवितेत त्यांनी मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व विशद केले आहे.)

i. कवयित्रीने पावसाचे वर्णन कसे केले आहे?
उत्तर:
कवयित्रीला पावसाचे थेंब हे मोत्यांप्रमाणे वाटतात. कवयित्रीस असे वाटत आहे, की जणू काही आकाशात कोणी परी मोत्यांची माळ ओवत आहे; परंतु ती गोंधळल्यामुळे तिच्या हातून ती मोत्यांची माळ निसटून गेली आहे व ते मोती पावसाच्या रूपाने जमिनीवर पडत आहेत. अशाप्रकारे, कवयित्रीने पावसाच्या सरींमधून बरसणाऱ्या पाण्याच्या थेंबांना मोत्याची उपमा दिली आहे.

ii. कवयित्रीने पाण्यास सोने-नाण्यापेक्षा बहुमोल का म्हटले आहे ?
उत्तर:
कवयित्री म्हणतात, की पाणी खऱ्या अर्थाने आपले जीवन आहे. त्याच्यामुळेच जमिनीतून धान्य उगवते. अन्न व पाणी या आपल्या मूलभूत गरजा आहेत. जर पाणीच नसेल, तर तिजोरीमध्ये कितीही सोनं नाणं असो त्याचा आपल्याला उपयोग होणार नाही, कारण पाण्याची तहान फक्त पाणीच भागवू शकते. त्याऐवजी तिजोरीत साठवलेल्या सोन्याचे घोट आपण घेऊ शकत नाही, त्यामुळे नाण्यांचा संचय करण्यापेक्षा बहुमोल पाण्याचा साठा करा, असा संदेश कवयित्री देतात.

भाषाभ्यास आणि व्याकरण

प्रश्न १.
खालील शब्दांसाठी समानार्थी शब्द लिहा.

  1. आभाळ =
  2. वर्षा =
  3. माती =
  4. निसर्ग =
  5. सोने =
  6. तहान =

उत्तर:

  1. नभ, आकाश, गगन, अंबर
  2. पर्जन्य, पाऊस
  3. मृदा, मृत्तिका
  4. सृष्टी, प्रकृती
  5. कांचन, स्वर्ण, कनक, हेम, कुंदन
  6. तृष्णा

प्रश्न २.
खालील शब्दांसाठी विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. जिणे ×
  2. बहुमोल ×
  3. प्रश्न ×
  4. कोती ×

उत्तर:

  1. मरणे
  2. कवडीमोल
  3. उत्तर
  4. उदार

प्रश्न ३.
खालील शब्दांचे लिंग ओळखा.

  1. तिजोरी
  2. थेंब
  3. निसर्ग
  4. सोने

उत्तर:

  1. स्त्रीलिंग
  2. पुल्लिंग
  3. पुल्लिंग
  4. नपुंसकलिंग

प्रश्न ४.
खालील शब्दांचे वचन बदला.

  1. गाणे
  2. सरी
  3. परी
  4. मोती
  5. माणूस
  6. नाणं
  7. घोट

उत्तर:

  1. गाणी
  2. सर
  3. पऱ्या
  4. मोती
  5. माणसे
  6. नाणी
  7. घोट

प्रश्न ५.
खालील शब्दांत लपलेले शब्द लिहा.

  1. तहानेसाठी
  2. आभाळातल
  3. वेडाचाळा

उत्तर:

  1. हात, साठी, सात, नेहा, तहासाठी
  2. आभा, आळा, भाल, तिळा, लळा
  3. वेडा, चाळा, वेचा, वेळा, डावे, चावे

Class 7 Marathi Balbharati Chapter 17 Question Answer थेंब आज हा पाण्याचा (कविता)

प्रश्न ६.
कवितेत ‘बहु’ प्रत्यय लागून बहुमोल शब्द आला आहे ‘बहु’ प्रत्यय लावून इतर शब्द तयार करा.
उत्तरः
Class 7 Marathi Balbharati Chapter 17 Question Answer थेंब आज हा पाण्याचा (कविता) 1

प्रश्न ७.
‘वेडाचाळा’ यासारखे जोडशब्द लिहा.
उत्तर:

  1. अग्निस्तंभ
  2. अश्रुधारा
  3. घोडचूक
  4. शेतमळा
  5. सणवार

प्रश्न ८.
हे शब्द उच्चारून पाहा.

i. चंद्र चांदणे
ii. आजीजोबा
iii. झाकास
असे आणखी शब्द मिळवा.
उत्तर:
i. मचा चश्मा
ii. हाज ज्यो
iii. जी
iv. व्यंन रां
v. रखा चिंच

प्रश्न ९.
हे शब्द असेच लिहा.
बहुमोल, संचय, निसर्ग, तिजोरी, स्वत: होऊनी, दृष्टिकोन.

लेखी कार्य

प्रश्न १.
तुमच्या शाळेच्या एका माजी विदयार्थ्याने शाळेत संगणक वर्ग सुरू करण्यासाठी देणगी दिली आहे. त्याबद्दल विदयार्थी प्रतिनिधी या नात्याने त्याचे आभार मानणारे पत्र लिहा.
उत्तर:
सुशांत गोवेकर
शारदा विद्यालय
मुलुंड (प.)
मुंबई – ४०००८०
दिनांक : २०. ८. २०१७

प्रति,
मा. अड. श्रीकांत पालकर
माजी विद्यार्थी
कृष्णकुंज, दादर (प),
मुंबई – ४०००१४.

विषय : शाळेत संगणक वर्ग सुरू करण्याकरता देणगी दिल्याबद्दल.

आदरणीय महोदय,
स. न. वि. वि.

आपली शाळा अदययावत करण्यासाठी आपण शाळेत संगणक वर्ग सुरू करण्याची जी कल्पना सुचवली व त्यासाठी जी देणगी दिली त्याबद्दल मी शाळेच्या सर्व विदयार्थ्यांच्या वतीने विदयार्थी प्रतिनिधी म्हणून आपले आभार मानतो.

आजच्या काळासोबत चालायचे असल्यास विदयार्थ्यांना तंत्रज्ञानाची ओळख होणे गरजेचे आहे. आपल्या शाळेतील विदयार्थीसंख्या लक्षात घेता, उपलब्ध संगणकांची संख्या फार कमी होती. त्याअभावी संगणक वर्ग सुरू करता येत नव्हते. तुम्ही चाणाक्षपणे ही गरज एका भेटीतच ओळखली व त्यासाठी देणगी दिली.

शाळेतील सर्व विदयार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. सर्वच या सुविधेचा योग्य फायदा घेऊन आपल्याप्रमाणेच शाळेचे नाव मोठे करतील. विदयार्थ्यांना संगणकाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल पुन्हा एकदा आभार !

आपला नम्र,
सुशांत
(विदयार्थी प्रतिनिधी)

थेंब आज हा पाण्याचा (कविता) कवितेचा भावार्थ:

कवयित्री सुनंदा भावसार यांच्या ‘थेंब आज हा पाण्याचा’ या गीतातून त्यांनी पाण्याचे व जलसंवर्धनाचे महत्त्व विशद केले आहे. कवयित्री म्हणतात की, “आपल्या या गाण्याचा विषयच मौल्यवान पाणी हा आहे. त्याच्या अर्थाकडे लक्ष दया.

जणू काही नभातील कोणी परी मोत्यांची माळ ओवत आहे व ते मोती ओवताना गोंधळलेल्या परीकडून ती माळ निसटून ते मोती जमिनीवर खाली पडत आहेत, तसे हे पावसाच्या सरींच्या रूपाने जलरूपी मोतीच खाली पडत आहेत. हे पाणी मोत्याप्रमाणे मौल्यवान आहे. पाणी आहे, तरच मानवी जीवन आहे, म्हणून हे मानवा, तू या जलरूपी मोत्यांचा साठा कर.

या पाण्यामुळेच शेतं फुलतात, पिकतात. त्या धान्याचे मोत्यांसारखे दाणे या पाण्याचेच वरदान आहे. जर निसर्गाला पाण्याचे महत्त्व समजते; तर तुम्ही माणसेच का संकुचित वृत्तीने वागता ? पाण्याचे महत्त्व लक्षात घेत नाही व धनसंपत्ती यांच्या संचयामध्येच मग्न राहता.

स्वतःलाच फसवून असा अविचार का करत आहात? निसर्गाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे. पाणी असेल, तरच माणूस जगू शकतो, कारण कितीही धनसंचय केला, तरी तहान भागवण्यासाठी माणसाला पाणीच लागणार आहे. तिजोरीमध्ये साठवलेल्या सोन्याने तहान भागणार नाही. तेव्हा पाण्याचा साठा करा. पाण्याचे मोल जाणून घ्या. ते बहुमोल आहे.”

थेंब आज हा पाण्याचा (कविता) शब्दार्थ

कोती संकुचित वृत्त
जीणे जगणे
ठगणे फसवणे
तिजोरी मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी असलेला कपाटातील खण
बहुमोल मौल्यवान
बावरणे गोंधळणे
मोल मूल्य
वर्षा पाऊस
वेडाचाळा वेडेपणा, अविचार
संचय साठवणे

Leave a Comment