Students can find the best Marathi Balbharati Class 7 Solutions and Chapter 18 Question Answer वदनी कवळ घेता for exam preparation.
Std 7 Marathi Balbharati Chapter 18 Question Answer वदनी कवळ घेता
Maharashtra Board Solutions Class 7 Marathi Balbharati Chapter 18 वदनी कवळ घेता
वदनी कवळ घेता Question Answer
शोध घेऊया. (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ८८)
कुपोषण ही एक खूप मोठी समस्या आहे. आदिवासी दुर्गम भागांत या समस्येचे भयावह स्वरूप पाहायला मिळते. आंतरजालावरून या समस्येची खालील प्रश्नांच्या आधारे माहिती करून घ्या.
(१) ही समस्या का निर्माण होते ?
उत्तरः
पुरेसा आणि संतुलित आहार न घेतल्यामुळे अशक्तपणाची आणि आजारपणाची जी परिस्थिती निर्माण होते, त्यास कुपोषण म्हणतात. अयोग्य आहार, उपासमार व जीवनसत्त्वांच्या अभावामुळे ही समस्या निर्माण होते.
(२) या समस्येच्या निराकरणासाठी कोणकोणत्या संस्था कार्य करत आहेत?
उत्तर:
या समस्येच्या निराकरणासाठी खालील संस्था कार्यरत आहेत:
अ. अक्षय पात्र
ब. भविष्य अलायन्स
क. कडल फाऊंडेशन
ड. सेव द चिल्ड्रेन
इ. केअर इंडिया
या संस्थांसोबत युनिसेफ (UNICEF) यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थाही कुपोषणाच्या निराकरणासाठी कार्य करत आहेत.
(३) या संस्था कोणत्या स्वरूपाचे काम करतात?
उत्तर:
या संस्था आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या समुदायातील मुलांना संतुलित आहार उपलब्ध करून देतात, तसेच कुपोषित मुलांच्या उपचारांची व्यवस्थाही करतात. काही संस्था रुग्णालयांमधून माता व बालके यांच्यासाठी आवश्यक आहाराची माहिती देतात व समुपदेशन करतात. या सर्व संस्था समाजातील सक्षम गटातून निधी उभारून त्यातून दुर्गम भागातील वंचितांना सकस आहार उपलब्ध करून देतात.
(४) तुमच्या परिसरात एखादे कुपोषित बालक तुमच्या निदर्शनास आल्यास तुम्ही त्याच्यासाठी काय कराल, लिहा.
उत्तर:
आमच्या परिसरात मला एखादे कुपोषित बालक दिसल्यास मी त्याची विचारपूस करेन. आमच्या डॉक्टरांना विचारून त्याला घरातून काही खाद्यपदार्थ नेऊन देईन. आई – बाबांच्या मदतीने त्या मुलाच्या पालकांशी संपर्क साधेन व कुपोषित मुलांसाठी मदतकार्य करणाऱ्या संस्थांची माहिती त्यांना देईन. संस्थेतील कार्यकर्त्यांना त्या मुलाची मदत करण्याची विनंती करेन.
चर्चा करूया. (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ८८)
(१) आपण वाढदिवसाला कोणकोणत्या गोष्टींसाठी खर्च करतो?
उत्तर:
आपण वाढदिवसाला नवीन कपडे, भेटवस्तू, केक, पाहुण्यांसाठी अल्पोपहार किंवा भोजनाचे पदार्थ व सजावट यांवर खर्च करतो. काही लोक वाढदिवसाच्या समारंभासाठी खास सभागृह, उपहारगृह यांवरही खर्च करतात.
(२) मी माझा वाढदिवस कसा साजरा करू इच्छितो / इच्छिते ?
उत्तर:
मी माझा वाढदिवस माझ्या घरातल्या माणसांसोबत, माझ्या मित्रमैत्रिणींसोबत साजरा करू इच्छिते. मला वाढदिवसासाठी बेसुमार खर्च किंवा मोठा समारंभ करायला आवडत नाही. त्यापेक्षा घरी सगळ्यांशी गप्पा मारत, आईने माझ्या आवडीचा बनवलेला खाऊ खात साजरा करणे मला जास्त आवडेल. वाढदिवसाला होणाऱ्या खर्चातील पैशांतून गरजू विदयार्थ्यांना खेळणी किंवा शालोपयोगी वस्तू दयायला मला आवडेल:
(३) हॉटेलमधील उरलेल्या अन्नाचे काय करतात ?
उत्तर:
बऱ्याच हॉटेलमध्ये उरलेले अन्न कचराकुंडीत टाकले जाते; परंतु काही ठिकाणी उरलेल्या अन्नाचा सदुपयोगही केला जातो. काही हॉटेल्स उरलेल्या अन्नातील सुस्थितीतील अन्न गरजूंना देतात, तसेच जे अन्न खाण्यालायक नाही त्यापासून कंपोस्ट खताची किंवा बायोगॅसची निर्मितीही केली जाते.
(४) काही कारणास्तव अन्न शिल्लक राहिले, तर तुमच्या घरी त्याचे काय करतात?
उत्तर:
काही कारणामुळे आमच्या घरात अन्न शिल्लक राहिलेच, तर आई ते खराब होण्यापूर्वीच परिसरातील गोरगरिबांना देते.
लक्षात ठेवा
स्वाध्याय
प्रश्न १.
श्रुतीच्या नाराजीच्या परिणामाबाबत तुमचे मत लिहा.
उत्तर:
श्रुतीच्या मॅडमनी वर्गात सगळ्यांना नवीन वर्षाचा संकल्प विचारला होता; परंतु इतरांपेक्षा वेगळा संकल्प न सांगता आल्याने ती नाराज होती, त्यामुळे मावशीकडे मावसबहिणीच्या वाढदिवसाला गेली असताना तिथे ताटामधील फक्त एक गुलाबजाम खाऊन बाकी सर्व अन्न ताटात तसेच टाकले होते. एखादी व्यक्ती नाराज असल्यावर खाण्याची इच्छा नसणे हे साहजिक आहे; परंतु माझ्या मते तिने इच्छा नसताना संपूर्ण ताट भरून अन्नपदार्थ घेणे टाळायला हवे होते. तिला हवे होते तितकेच पदार्थ घेता आले असते किंवा वाढलेले पदार्थ ती आईकडे देऊ शकली असती अथवा ते बांधून रस्त्यावर कोणा गरजू व्यक्तीला, प्राण्यालाही देता आले असते. आपल्या नाराजीमुळे अन्नाची नासाडी करणे किंवा ते वाया घालवणे हे चुकीचेच आहे.
प्रश्न २.
आई श्रुतीवर का रागावली ?
उत्तर:
श्रुती आईसोबत मावशीकडे मावसबहिणीच्या वाढदिवसाला गेली होती. तिथे तिच्या आवडीचा बेत असूनही नाराज असल्यामुळे श्रुतीने एक गुलाबजाम खाऊन बाकी ताट तसेच बेसिनमध्ये ठेवले, तिने ते आईकडेही दिले नाही. अशाप्रकारे, श्रुतीने अन्न वाया घालवल्यामुळे आई श्रुतीवर रागावली.
प्रश्न ३.
श्रुतीला नवीन वर्षाचा कोणता संकल्प सुचला ?
उत्तर:
श्रुतीने मावसबहिणीच्या वाढदिवसाला अन्न वाया घालवल्यामुळे तिला आई-बाबा ओरडले होते व बाबांनी समजावलेही होते. याच वेळी पुरेसे अन्न न मिळाल्याने कुपोषित झालेली मेळघाटातील मुले दूरदर्शनवर पाहून यापुढे कधीही पानात अन्न टाकायचे नाही असा नववर्षाचा संकल्प श्रुतीला सुचला.
प्रश्न ४.
खालील ओळींचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
मुखी घास घेता करावा विचार ।
कशासाठी हे अन्न मी सेविणार । ।
उत्तर:
अन्नग्रहण करताना आपण कोणते कार्य करण्यासाठी हे अन्न सेवन करत आहोत याचा विचार करावा असे या ओळींमध्ये म्हटले आहे. फक्त पोट भरण्यासाठी न खाता, या अन्न सेवनानंतर मिळणाऱ्या ऊर्जेतून आपल्या हातून काही सत्कार्य घडावे असा अर्थ येथे अभिप्रेत आहे.
• खाली काही कृती दिलेल्या आहेत. त्या योग्य की अयोग्य आहेत ते ठरवा. पुढे दिलेल्या चौकटींमध्ये ते नोंदवा.
(अ) वैभवी शाळेत येताना घरी डबा विसरली. त्यावेळी अनुजाने स्वतःच्या डब्यातील पोळीभाजी तिला दिली. …………..
उत्तर:
योग्य
(आ) राजेंद्र सतत बाहेरचे जंकफूड खातो. …………..
उत्तर:
अयोग्य
(इ) यास्मिन टीव्ही बघत जेवण करते. …………..
उत्तर:
अयोग्य
(ई) आनंद जेवण करण्यापूर्वी हात स्वच्छ धुतो. …………..
उत्तर:
योग्य
(उ) पीटर जेवताना खूपच बडबड करतो. …………..
उत्तर:
अयोग्य
(ऊ) रूपाली सर्व प्रकारच्या भाज्या खाते. …………..
उत्तर:
योग्य
आपण समजून घेऊया.
• खालील शब्द वाचा.
पितो, महिमा, खजिना, पादुका, झोपवितो, गरिबी, बिया, लिली, पहिली, पुरी, चुका, बाहुली, वनिता, विहिरी, सगुणा, भिडू, जिना.
वरील शब्दांतील शेवटच्या दोन अक्षरांचे निरीक्षण करा. काय जाणवले ?
या शब्दांतील शेवटच्या अक्षराला काना, मात्रा, वेलांटी, उकार अशी बाराखडीतील चिन्हे (दीर्घ स्वरान्त) आहेत आणि शेवटून दुसऱ्या अक्षरांतील इकार व उकार -हस्व आहेत.
शब्दांतील शेवटचे अक्षर दीर्घ स्वरान्त असेल, तर त्या आधीच्या उपान्त्य अक्षरातील इकार व उकार स्व लिहितात.
या नियमाला अपवाद म्हणजे जेव्हा एखादया शब्दाला प्रत्यय लागतो तेव्हा सामान्यरूपातील नामाचे उपान्त्य अक्षर हस्व होत नाही.
उदा.,
पालीला ✓
पालिला ✗
बहिणीला ✓
बहिणिला ✗
• खालील चित्रांची नावे लिहा.
उत्तर:
Class 7 Marathi Balbharati Chapter 18 वदनी कवळ घेता Question Answer
पाठाधारित प्रश्नोत्तरे
प्रश्न १.
कंसातील योग्य पर्याय शोधून रिकाम्या जागा भरा. (नाराजी, रागा, निराशे)
- श्रुती जरा ……. नंच घरी आली.
- घरी आल्यावर ……… श्रुतीला खूप रागावली. (ताई, आई, मावशी)
- ……….. मनानं श्रुती खुर्चीत मान खाली घालून बसली होती. (दु:खी, हताश, खट्टू)
- श्रुतीला नववर्षाचा …….. सुचला. (बेत, निर्धार, संकल्प)
उत्तर:
- नाराजी
- आई
- खट्टू
- संकल्प
प्रश्न २.
सत्य की असत्य ते लिहा.
- खनिज तेल, लाकूड ही इंधने दुर्मीळ होत चालली आहेत.
- अन्नपदार्थ टाकले तरी धान्याची नासाडी होत नाही.
- अन्नपदार्थ टाकल्याने अनेक व्यक्तींचे कष्ट वाया जातात.
- उरलेले अन्न कचराकुंडीत फेकले जात नाही.
उत्तर:
- सत्य
- असत्य
- सत्य
- असत्य
प्रश्न ३.
पाठातील गोष्टी क्रमाने लिहा.
- श्रुतीने दूरदर्शनवर मेळघाटातील कुपोषित बालके बघितली.
- श्रुती नाराजीनंच घरी आली.
- श्रुतीने एक गुलाबजाम खाल्ला अन् डिश बेसिनमध्ये ठेवून दिली.
- श्रुतीला नववर्षाचा संकल्प सुचला.
- आई श्रुतीला खूप रागावली.
उत्तर:
- श्रुती नाराजीनंच घरी आली.
- श्रुतीने एक गुलाबजाम खाल्ला अन् डिश बेसिनमध्ये ठेवून दिली.
- आई श्रुतीला खूप रागावली.
- श्रुतीने दूरदर्शनवर मेळघाटातील कुपोषित बालके बघितली.
- श्रुतीला नववर्षाचा संकल्प सुचला.
प्रश्न ४.
आकृती पूर्ण करा.
अन्नपदार्थ टाकल्याने वाया जाणारे घटक
उत्तर:
१. इंधन
२. भाज्या, मसाले, तेल, तूप
३. धान्य
४. अन्नपदार्थ तयार करणे ते भांडी घासण्यापर्यंत सर्व कामे करणाऱ्यांचे कष्ट
प्रश्न ५.
एका वाक्यात उत्तरे लिहा.
i. श्रुती का नाराज झाली होती?
उत्तर:
वर्गात मॅडमनी नववर्षाचा संकल्प विचारला असता इतरांपेक्षा वेगळा संकल्प सांगता न आल्यामुळे श्रुती नाराज झाली होती.
ii. श्रुती कोणाच्या वाढदिवसाला गेली होती?
उत्तरः
श्रुती तिच्या मावसबहिणीच्या वाढदिवसाला गेली होती.
iii. वाढदिवसाला जेवणाचा काय बेत होता ?
उत्तर:
वाढदिवसाला गुलाबजाम, केक, कचोरी आणि पुलाव असा बेत होता.
iv. श्रुतीच्या बाबांच्या ऑफिसमधील केटरिंगवाला कोणता बोर्ड लावतो ?
उत्तर:
ऑफिसमधील कर्मचाऱ्यांनी किती अन्न पानात टाकले व त्यात किती लोक जेवू शकतात, असा बोर्ड श्रुतीच्या बाबांच्या ऑफिसमधील केटरिंगवाला लावतो.
v. श्रुतीने दूरदर्शनवर काय पाहिले?
उत्तर:
श्रुतीने दूरदर्शनवर मेळघाटातील कुपोषित बालके पाहिली.
प्रश्न ६.
खालील ओळींचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
i. ‘जरा विचार करूया’ येथे दिलेल्या श्लोकाचा अर्थ तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
वदनी कवळ घेता नाम घ्या मातृभूचे ।
सहज स्मरण होते आपल्या बांधवांचे ।।
कृषिवल कृषिकर्मी राबती दिनरात ।
श्रमिक श्रम करूनि वस्तू त्या निर्मितात ।।
स्मरण करूनि तयांचे अन्न सेवा खुशाल ।
उदरभरण व्हावे चित्त होण्या विशाल ।।
उत्तर:
अन्नग्रहण करताना आपल्या मातृभूमीचे स्मरण करा, तसेच आपल्या देशबांधवांचीही आठवण ठेवा. शेती कसणारा, शेत नांगरणारा शेतकरी दिवसभर राबतो तेव्हा आपल्याला धान्य मिळते. इतरही कष्टकरी जेव्हा मेहनत घेऊन निरनिराळ्या वस्तू बनवतात तेव्हा त्या आपल्यासाठी उपलब्ध होतात. या सर्वांच्या कष्टामुळे आपल्या ताटात अन्न येते, त्यामुळे जेवताना त्याची जाणीव असू दया. अशा अन्नग्रहणाने आपले मन विशाल झाले पाहिजे, अशी प्रार्थना करूया.
प्रश्न ७.
खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
(टीप: खालील प्रस्तावना प्रत्येक उत्तराच्या सुरुवातीस वापरता येऊ शकते.
प्रस्तावनाः ‘वदनी कवळ घेता…’ या पाठात श्रुतीच्या उदाहरणावरून अन्नाचा होणारा अपव्यय व त्यावरील उपाय यांबद्दल माहिती दिली आहे.)
i. अन्नपदार्थ टाकल्याने कोणकोणत्या गोष्टी वाया जातात?
उत्तर:
अन्नपदार्थ खाताना ते शिजवण्यापासून शेवटी भांडी घासण्यापर्यंत अनेकांची मेहनत त्यात अंतर्भूत असते. अन्न शिजवण्यासाठी इंधन, गॅस, मसाले, तेल, तूप यांचा वापर होतो. अन्न टाकल्याने या गोष्टी वाया जातात, तसेच चपाती, भाकरी, भात यांसारखे पदार्थ टाकल्याने धान्याचीही नासाडी होते. याचप्रमाणे अन्न तयार करण्याच्या प्रकियेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे कष्टही वाया जातात.
ii. अन्न वाया जाऊ नये, म्हणून समारंभांमध्ये आपण कशाप्रकारे काळजी घेऊ शकतो?
उत्तरः
समारंभांमध्ये लोकांना जेवण वाढताना खूप आग्रह करू नये. त्यांना हवे तितकेच वाढावे, तसेच स्वेच्छाभोजनाचा पर्याय निवडल्यास लोक हवे तेवढेच अन्न पानात घेतील व अन्नपदार्थ टाकले जाणार नाहीत, तसेच समारंभाचे स्वरूप मर्यादित ठेवून मोजकेच पदार्थ ठेवल्यास अन्नाचा अपव्यय टळतो. वाया जाणारे अन्न फेकून देण्याऐवजी गरजूंना दयावे, तसेच समारंभावर वाजवी खर्च करण्याऐवजी त्या पैशांतून गरजूंना मदतही करता येईल. अशाप्रकारे, आपण समारंभातील अन्नपदार्थांची नासाडी टाळू शकतो.
भाषाभ्यास आणि व्याकरण
प्रश्न १.
खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.
- संकल्प =
- शिल्लक =
- बहीण =
- कृषी =
- चित्त =
उत्तर:
- निर्धार, निश्चय
- बाकी
- भगिनी
- शेती
- मन
प्रश्न २.
खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
- कुपोषित ×
- बाहेर ×
- मर्यादित ×
- विशाल ×
- गरीब ×
उत्तर:
- पोषित
- आत
- अमर्यादित
- लघू, सूक्ष्म
- श्रीमंत
प्रश्न ३.
खालील शब्दांमध्ये लपलेले शब्द लिहा.
i. कचराकुंडी
उत्तर:
कचरा, कुंडी, चरा, करा, कडी
ii. उदरभरण
उत्तर:
उदर, भरण, भर, रण, दर, उद
प्रश्न ४.
‘ईक’ हा प्रत्यय लावून शब्द तयार करा व लिहा.
उत्तर:
- सामाजिक
- सांस्कृतिक
- भौगोलिक
- कौटुंबिक
- आर्थिक
- बहुभाषिक
- वैज्ञानिक
- सात्विक
- ऐतिहासिक
- जागतिक
- धार्मिक
- तात्विक
प्रश्न ५.
‘अप’ हा उपसर्ग वापरून शब्द तयार करा व लिहा.
उत्तर:
- अपशब्द
- अपहरण
- अपक्षय
- अपव्यय
- अपक्षालन
- अपसरण
- अपवाद
- अपमान
- अपशकुन
प्रश्न ६.
खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा.
i. कानावर घालणे – सांगणे, कळवणे.
वाक्य:बाईंनी संजूच्या शाळेतील खोड्या त्याच्या आईच्या कानावर घातल्या.
ii. नाराज होणे – निराश होणे.
वाक्य: खूप प्रयत्न करूनही सतीशला नोकरी न मिळाल्याने तो नाराज झाला होता.
iii. दिलासा मिळणे – आधार मिळणे.
वाक्य: वेळेवर पाऊस पडल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.
iv. फाटा देणे – विषयांतर करणे.
वाक्य:आईने अभ्यासाचा विषय काढताच रवीने त्यास फाटा देत सहलीचा विषय काढला.
प्रश्न ७.
खालील वाक्यांत योग्य विरामचिन्हांचा वापर करून वाक्ये पुन्हा लिहा.
i. खायचं नव्हतं तर डिश मला का आणून दिली नाहीस वगैरे वगैरे
उत्तर:
‘खायचं नव्हतं, तर डिश मला का आणून दिली नाहीस?’ वगैरे वगैरे.
ii. एवढ्यात आई बाहेर येत म्हणाली आणि ज्यांना जेवायला मिळते ते टाकून देतात
उत्तर:
एवढ्यात आई बाहेर येत म्हणाली, “ आणि ज्यांना जेवायला मिळते ते टाकून देतात.”
प्रश्न ८.
हे शब्द असेच लिहा.
वैविध्य, कुपोषित, खट्टू, संकल्प, स्वेच्छाभोजन, अन्नपदार्थ, कृषिकर्मी.
आकारिक मूल्यमापन
मौखिक कार्य
प्रश्न १.
तुम्ही स्वतःच्या हाताने जेवण वाढून घेता का? असे करताना तुम्ही कोणती काळजी घेता?
उपक्रम / प्रकल्प
प्रश्न १.
कुपोषण टाळण्यासाठी आवश्यक अशा संतुलित आहाराची माहिती घ्या व तुमच्या शाळेच्या परिसरात त्या माहितीवर आधारित पथनाट्ये सादर करा.
प्रश्न २.
विदयार्थी व पालकांनी एकत्र येऊन मदत गट तयार करा आणि त्यामार्फत तुमच्या परिसरातील गोरगरिबांना अन्नदान करा.
(वरील उपक्रम विदयार्थ्यांनी स्वतः करावेत.)
वदनी कवळ घेता पाठाचा परिचय :
‘वदनी कवळ घेता…’ या पाठात अन्न वाया गेल्यास कोणत्या घटकांचा अपव्यय होतो, याबद्दल माहिती दिली आहे. तसेच
हा अपव्यय टाळण्याचे उपायही सुचवले आहेत. या पाठात श्रुतीची एक छोटी कथाही दिली आहे. जेवल्यानंतर ताटात अन्न टाकू नये हा संदेश त्यातून दिला आहे.
वदनी कवळ घेता शब्दार्थ
अपव्यय – वाया
अवाजवी – आवश्यकतेपेक्षा जास्त
इंधन – जळण, सरपण
उदरभरण – पोट भरणे
एव्हाना – आतापर्यंत
कुपोषित – योग्य आहार, उपासमार व जीवनसत्त्वांचा अभाव
कृषिवल – शेतकरी, शेती करणारा
कृषिकर्मी – शेती नांगरणारा (शेतकरी)
चित्त – मन
जेवणावळी – जेवणाच्या पंगती
झकास – उत्कृष्ट, उत्तम
दुर्गम – पोहोचण्यास कठीण प्रदेश
दुर्मीळ – दुर्लभ, मिळण्यास कठीण
नासाडी – नासधूस, नाश
मातृभू – मातृभूमी, मायदेश, स्वत:चा देश
यजमान – पाहुणे
रेलचेल – विपुलता, समृद्धी
विशाल – मोठे
वैविध्य – विविधता
संकल्प – निर्धार
श्रमिक – कष्टकरी, कष्ट करून पोट भरणारे
होतकरू – मेहनत करून प्रगती करणारा
वदनी कवळ घेता वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
फाटा देणे. | विषयांतर करणे, विषय बदलणे. |
दिलासा मिळणे. | आधार मिळणे. |
कानावर घालणे. | सांगणे, कळवणे. |
नाराज होणे. | निराश होणे. |
वदनी कवळ घेता टिपा
मिष्टान्नम् इतरेजनः | संस्कृत सुभाषिताचा एक भाग. अर्थ: समारंभात उपस्थित लोकांना समारंभापेक्षा सुग्रास अन्नामध्येच रस असतो. |
मेळघाट | महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेला एक दुर्गम भाग. हा प्रदेश कुपोषणग्रस्त विभागांत अग्रक्रमांकावर आहे. |