SSC Maharashtra Board Marathi Question Paper 2020 with Answers

Maharashtra Board SSC Class 10 Marathi Question Paper 2020 with Answers Solutions Pdf Download.

SSC Marathi Question Paper 2020 with Answers Pdf Download Maharashtra Board

वेळ – ३ तास
एकूण गुण- १००

कृतिपत्रिकेसाठी सूचना
(१) सूचनेनुसार आकलनकृती व व्याकरण यांमधील आकृत्या काढाव्यात.
(२) आकृत्या पेननेच काढाव्यात.
(३) उपयोजित लेखनातील कृतींसाठी (सूचना निवेदन) आकृतीची आवश्यकता नाही. तसेच या कृती लिहून घेऊ नयेत.
(४) विभाग- ५ उपयोजित लेखन प्र. ५ (अ) (२) सारांशलेखन या घटकासाठी गदय विभागातील प्र. १ (इ) अपठित उतारा वाचून त्या उताऱ्याचा सारांश लिहावयाचा आहे.
(५) स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखननियमांनुसार लेखन यांकडे जाणीवपूर्वक लक्ष दयावे.

विभाग १ : गदय २४ गुण

पठित गद

प्रश्न 1.
(अ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. कोण ते लिहा. (02)
(i) नेहमी तिरके बोलणारे – ……………….
(ii) बटाटा सोडण्याचा सल्ला देणारे – ……………….

“दोन महिन्यांत पन्नास पौंड वजन कमी करून दाखवीन तर खरा!” अशी भीष्मप्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो. प्रोटीनयुक्त पद पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये वगैरे शब्दांबद्दलची माझी आस्था वाढू लागली. साऱ्या ताटांतले पदार्थ मला न दिसता नुसत्या ‘कॅलरीज’ मला दिसू लागल्या आणि आनंदाची गोष्ट अशी, की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझनवारीने भेटू लागले. इतकेच काय, परंतु ज्या आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या उपासाची अवहेलना केली होती, त्यांनीच मला ‘डाएटचा’ सल्ला दिला. उदाहरणार्थ- सोकाची त्रिलोकेकर.

“तुला सांगतो मी पंत, ‘डाएट’ कर. बटाटा सोड. बटाटयाचंनाव काढू नकोस.”
“हो! म्हणजे ‘कुठं राहता ?’ म्हणून विचारलं तर नुसतं चाळीत राहती’ म्हणा. ‘बटाटयाची चाळ’ म्हणू नका. वजन वाढेल! खी खी खी!” जनोबा रेगे या इसमाला काय म्हणावे हे मला कळत नाही. नेहमी तिरके बोलायचे म्हणजे काय? पण सोकाजींनी त्याला परस्पर जामून टाकले. “ए इडिअट! सगळयाच गोष्टींत जोक काय मारतोस नेमी? मी सांगतो तुला पंत- तू बटाटा सोड.”

2. कृती पूर्ण करा. (02)
SSC Maharashtra Board Marathi Question Paper 2020 with Answers 1

3. पंतांना उपासाबाबत मिळालेल्या विविध सल्ल्यांचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा. (03)

(आ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. का ते लिहा.
(i) डॉ. माशेलकर यांना माशेल हे गाव सोडावे लागले, कारण → ………………
(ii) ‘शाळेत कसा जाऊ ?’ असा प्रश्न डॉ. माशेलकर यांच्यापुढे उभा राहिला, कारण → ………………

आमचे मूळ गाव दक्षिण गोव्यातील माशेल. माझे बालपण तिथेच गेले. माझे मामाही याच गावातले. तिथल्या एका मैदानावर खेळल्याच्या आणि पिंपळकट्ट्यावर बसून निवांतपणा अनुभवल्याच्या पुसटशा आठवणी माझ्या मनात अधूनमधून वाऱ्याच्या लहरीसारख्या येत असतात. माझ्या वयाच्या सहाव्या वर्षी माझे वडील वारले आणि आम्हांला उदरनिर्वाहासाठी आमचे माशेल हे गाव सोडावे लागले. मी आणि माझी आई मुंबईत येऊन पोहोचलो. गिरगावातल्या खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये ‘मालती निवासा’ तील पहिल्या माळयावर छोटयाशा खोल्यांमध्ये आम्ही मायलेक राहत होतो. आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेली. दारिद्रयाशी संघर्ष करणारी माझी अल्पशिक्षित आई आणि शिक्षणासाठी आसुसलेला. पण कोणतीच फी भरणे शक्य नसल्याने ‘शाळेत कसा जाऊ ?’ असे प्रश्नचिन्ह घेऊन वावरणारा मी. | त्यावेळचं वातावरण हे असं होतं!

पण माझ्या आईनं धीर सोडला नाही. ती खचली नाही. वेगवेगळी कष्टाची कामं ती करत होती. त्यातच माशेलहून मुंबईत आलेले माझे मामाही मदतीला आले. त्यांच्यामुळे मला खेतवाडीतील प्राथमिक शाळेत प्रवेश मिळू शकला. ही शाळा महापालिकेची होती. माझ्याप्रमाणेच शाळेचीही परिस्थिती बेताचीच होती; पण इथले शिक्षक मात्र मनानं खूप श्रीमंत होते. पायात चप्पलही घालायला नव्हती अशा परिस्थितीत माझी शाळा सुरू होती.

2. आंकृती पूर्ण करा. (2)
SSC Maharashtra Board Marathi Question Paper 2020 with Answers 2
3. स्वमतः (3)
शालेय विदयार्थ्याच्या भूमिकेतील डॉ. माशेलकर यांचे तुम्हांला जाणवलेले गुणविशेष सोदाहरण लिहा.

अपठित गद्य

(इ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. योग्य जोडया लावा. (2)

‘अ’ गट ‘ब’ गट
(i) सूर्य पाणी
(ii) मेघ वस्त्र
(iii) शेतकरी प्रकाश
(iv) विणकर धान्य

संयमाला तुच्छ मानू नका. तुच्या विकासासाठी तो आहे. समाजाच्या हितासाठी तो आहे. आपण संयम पाळला नाही, तर आपले काम नीट होणार नाही. काम नीट झाले नाही म्हणजे समाजाचे नुकसान होणार. आपण केवळ आपल्या स्वतः साठी नाही. आपण समाजासाठी आहोत, याची जाणीव आपणांस हवी. हा आपला देह हे आपले जीवन समाजाचे आहे. | आपले पोषण सारी सृष्टी करीत आहे. सूर्य प्रकाश देत आहे, मेघ पाणी देत आहेत, वृक्ष फुले-फळे देत आहेत, शेतकरी धान्य देत आहे, विणकर वस्त्र देत आहे. आपण या सर्व सजीव-निर्जीव सृष्टीचे आभारी आहोत. यासाठी हे आपले जीवन त्यांच्या सेवेत अर्पण करणे हे आपले काम आहे.
2. एका शब्दात उत्तरे लिहा.
(i) आपल्या विकासासाठी आवश्यक असलेला – ………………
(ii) आपले पोषण करणारी – ………………
उत्तर:
(अ) 1. (i) नेहमी तिरके बोलणारे – जानोवा रेगे
(ii) बटाटा सोडण्याचा सल्ला देणारे – सोकाजी त्रिलोकेकर

2. (i) प्रोटीनयुक्त पदार्थ
(ii) चरबीयुक्त द्रव्ये

3. पंतांच्या उपवासाची बातमी कष्ठताच चालीनाऱ्या अनेक लोकांनी हांना निरनिरार्थ सले दिले. त्यात सोकाजी त्रिलोकेकरांनी बटाटा सोडण्याचा दिल म्हणजे बटाटयाचे नावसुहरा घेऊ नकोस अधे म्हणजे कोणत्या चालत राहता विचारको नर चाळीत राहतो असे जानोवा रेंगे देआत. काशीजाय नाकर्णी म्हणतात भाताने भागूस होत नाही त्यांच्या मते कोकणातील सगले लोक भाव खातान परंतु तेले कठ्ठ असन नाहीत. कोणी साखर सोडण्याचा दिळा तर कोणी कोणी सकाजी रनिंग करावे व संध्याकनि दोरीवच्या उडंचामाराव्यान असा सघनु दिल.

बसून बसून वजन वाढते म्हणून पले खेळणे सोडण्याचा पंताना दिल गेऊ. अशा प्रकारे उपवासावाबत विविध रुके पंतांना दिये गेले.

SSC Maharashtra Board Marathi Question Paper 2020 with Answers

(आ) 1. (i) वडिळांच्या मृत्युनंतर उदरनिर्वाह करण्यासाठी
(ii) आर्थिक परिस्थिती खानवख्याने की भरणे शक्य नसल्याने

2.
SSC Maharashtra Board Marathi Question Paper 2020 with Answers 3

3. शालेय विदयार्थ्याच्या भूमिकेतील डॉ. माशेलकरांच्या विविध ओवल या प्राणद्वारे होते. डॉ. माशेलकरांच्या आईने केथेसोमोनन, त्यांना मामांनी केसेसी मदत, आणि शिक्षणासाठी शिक्षकांनी जे मार्गदर्शन कैसे त्या सर्वांची आठवण त्यांनी ठेवली सांच्याबहाव कृतज्ञता हा भाव ते कधीच विसरले नाहीत.

युनियन हायसूटमधीष्ठ शिक्षक मनाने सूप श्रीमंत होने असे ते म्हणतात या वाक्यातून सांध्यातील सुजाणनेची ओळख होते. अपुन्या जागेत व पूरक वातावरणाचा अभाव असूनही सांनी त्यावरपैकी मान यावरुन त्यांच्यात अलणारी जिद्द व चिकारी दिसून येते.

भावे सरांनी दिलेल्लया एकाग्रतेचा मंत्राचे लांनी काटेकोरपणे पाठन केसे यावसन आज्ञाधारकता का गुण दिसतो. यातून शालेय विद्यार्थ्यांच्या भूमिकेतील कृतज्ञता, सुजागना, जिदद्दव आज्ञाधारकना हे डॉ. माशेलकरांचे गुणविशेष जाणवतात.

(इ) 1. योग्य जोडच्या लावा.

‘अ’ गट ‘ब’ गट
(i) सूर्य प्रकाश
(ii) मेघ पाणी
(iii) शेतकरी धान्य
(iv) विणकर वस्त्र

2. (i) आपल्या विकासासाठी आवश्यक असलेला संयम
(ii) आपले पोषण करणारी सृष्टी

विभाग २: पदय

प्रश्न 2.
(अ) कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. चौकटी पूर्ण करा.
(i) मुळावर घाव घातले; तरी मुकाट सहन करणारे – ____________
(ii) अलगद उतरणारे थेंब – ____________
झाड बसते ध्यानस्थ ऋषिसारखं मौन व्रत
धारण करून तपश्चर्या करत ……..
पक्षी झाडाचे कुणीच नसतात
तरीही झाड त्यांचं असतं
मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते
झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर
अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब
झाडाकडे टक लावून पाहिलं तर
शरीरभर विरघळतो हिरवा रंग
रक्त होते क्षणभर हिरवेगार
आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलासारखं टवटवीत
झाडाचे बाहु सरसावलेले असतात मुसाफिराना कवेत घेण्यासाठी
पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं
नव्या नवरीसारखं
झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी
अन झटकली जाते मरगळ
पक्ष्यांच्या मंजुळ नादात झाडाचंही जीवनाचं
एक संथ गाणे दडलेले असते
हसावं कसं सळसळत्या पानासारखं
मुळा मुरावं कसं तर? झाडासारखं घट्ट पाय रोवीत
जगावं कसं तर? हिरवंगार झाडासारखं
रोजचं चिंतन करावं कसं तर झाडासारखं|
2. आकृती पूर्ण करा. (2)
SSC Maharashtra Board Marathi Question Paper 2020 with Answers 4
3. प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहा.
(i) मुकाट –
(iii) संथ –
(ii) मुसाफिर –
(iv) मौन व्रत –
4. काव्यसौंदर्य
‘जगावं कसं तर? हिरव्या झाडासारखं’ या ओळीतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा.

SSC Maharashtra Board Marathi Question Paper 2020 with Answers

(आ) खालील दोन कवितांपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दयांच्या आधारे कृती सोडवाः
SSC Maharashtra Board Marathi Question Paper 2020 with Answers 5
उत्तर:
(अ) 1. (i) मुळावर घाव घातले; तरी मुकाट सहन करणारे – झाड़
(ii) अलगद उतरणारे थेंब – दव्

2.
SSC Maharashtra Board Marathi Question Paper 2020 with Answers 6

3. (i) मुकाट निमूल्यपणे गुपचूप
(ii) मुसाफिर – प्रवार्या, वारवरू
(iii) संथ-हळू
(iv) मौन व्रत न बोळण्याचा नियम

4. झाड ते सदैव हिरवेगार, प्रसन्न, नाजे, टवटवीत अद्यने साच्याकडे पाहणासाचे मन सामुले आल्हाददायक व उत्साही होतो झाामुळे आपणान थंड सावढी मिलते फुले, फले मिलतात त्याचा जन्मच परोपकाराकरिता झापेल असतो उन्ह, वारा, पाऊस यामध्ये स्वतः सतत सडून खंबारपणे उभे असते यातून झाडाकडे असणाऱ्या सहनशीलता, दातृत्व, परोपकारी वृत्ती आणी कठीण प्रसंगानही संबीरपणे उभे राहण्याची वृत्ती दिसून येते. झाडाचा हा गुण माणसाने घेऊन जिद्दीने आयुष्यात योगाच्या खडतरपणे तोंड आयन शि पाहिजे. यासाठी कवी म्हणाज ‘जगावं कसं तर? हिरण्यागार झाडासारखं.

(आ)

मुद्दे ‘अंकिला मी दास तुझा’ किंवा ‘स्वप्न करू साकार’
1. प्रस्तुत कवितेचे कवी /कवयित्री संत नामदेव किशोर पाठक
2. प्रस्तुत कवितेचा विषय विविध दृष्टांतातून परमेश्वर कृपेची याचना कृषि संस्कृती, श्रम प्रतिष्ठा व एकतेचे सामर्थ्य यांचे जीवनानील महत्व
3. प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा अग्नीच्या संबंध जाणाच्या बासल पाहून त्याची दयाहू आई जशी साल वाचविण्यासाठी धाव घेते त्याप्रमाणे हे विहण भू माझ्यासाठी धाव, माझ्यावर कृपादृष्टी कर मी तुला शरण आदेश तुझा सेवक आहो. ‘हजार आम्ही एकी बलकर, सर्वांचे हो एकच मनगट आम्ही भारतीय संख्येने असंख्य आहोत लरी आमच्यात एकी आहे. आमच्या मनगटात एकीची शकी म्हणजे तकद आहे. कोणताही कणीव प्रसंगाज, संकटासा अत्यंत धीराने सामोरे जाण्यासाठी आमच्यातील हे सामर्थ्य तत्पर आहे. या आमच्यातील मनगटांच्या बराबर आम्ही विजयी होगार याचा आम्हाणा खात्री आहे.
4. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण ही कविता अतिशय कावडते कारण या कवितेत सेन नामदेवांनी दिलेली उदाहरणे अतिशय समर्पक व रोजच्या व्यवहारातील सामान्य माणसांच्या सहज येण्यासारसी आहेत चातक मेघ ही परिचित उदाहरणे. प्रस्तुत कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे या कवितेतून कवीने आपल्या विविधतेने नरसेव्या, सर्वबाबतीन विविधता असलेल्या देशातून विविधतेतही एकता कशी आहो आठी या एकतेत अससेल्या सामर्थ्याच्या जोरावर आपण कसा विजय संपादन करतो याचे वर्णन केसे आहे कृषि संस्कृती श्रम प्रतिष्ठा यांचेही महत्त्व सांगिते. आहे. म्हणून मान ही कविता मनापासून आवडते.
5. प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा (i) काज काम
(ii) सर्वे खगेच
(iii) पाडस – हरणाचे
(iv) धेनू गाय
(i) विभव ऐश्वर्य, भाग्य
(ii) मंगल – पवित्र
(iii) श्रम – कष्ट
(iv) हस्त – हात

विभाग ३ : स्थूलवाचन

प्रश्न 3.
खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा. (6)
(1) टीप लिहा : व्युत्पत्ती कोशाचे कार्य.
(2) स्काय इज द लिमिट’ ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते हे मोठे होत असलेल्या मुलांनो’ या पाठाच्या आधारे लिहा.
(3) ‘थोडयाशा पाण्यावर कसे वाढावे याचा नमुना म्हणजे कॅक्टस !’ या विधानाची यथार्थता स्पष्ट करा.
उत्तर:
व्युत्पत्ती कोशाचे कार्य : व्युत्पत्ती म्हणजे एखाद्या शब्दाची मुळ्यापासून माहिती देणे. हे व्युत्पत्ती कोशाचे प्रमुख कार्य आहे. याचे प्रामुख्याने चार प्रकार पडतातः।

  1. शब्दाचे मूळ रूप दाखवणे : बदलत जात असलेल्या भाषेचे व शब्दांचे मूळरूप आपण व्युत्पत्ती कोशात पाहू शकतो.
  2. अर्थांतील बदल स्पष्ट करणे : बदलत्या काळानुसार शब्दाचा मूळ अर्थासोबत आणखी एक अर्थ सापडतो… 3. उच्चारातील बदल व फरक दाखवणे : एखाद्या शब्दाचा इतिहास, अर्थ व भाषेत तो कसा प्रचलित झाला. याची माहिती मिळते,
  3. बदलांचे कारण स्पष्ट करणे : सोपेशब्द वापरण्यासाठी बहुधा आपण शब्दांत बदल करतो. आणि ते प्रचलित सुद्धा . होतात.
  4. 4. बदलांचे कारण स्पष्ट करणे हे युद्धा व्युहती कोशाचे कार्य आहे….

(2) लेखक ‘भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटरच्या ट्रेनिंग सूल मध्ये प्रशिक्षण होते त्यावेळी बार्क ही संख्या सूप लहाण असधाने एवढया सर्व प्रशिक्षणार्थीसाठी काम या संख्येत असेक काहू सर्वांना प्रश्न पडला. त्यावेळी डॉ. होमी भाभा यांनी यांनी सांगिले तुम्ही स्वत:चा तुमच्यासाठी काम निर्माण करा. आपण काय करायचे ते आपणच ठरवायचे ‘बॉस सांगेल नेषद्वेच काम करायचं आण इतर वेळी काम नाहा म्हणून गद्य बसायच सांना पसंन नाही या प्रमाणे त्यांनी मार्गदर्शन म्हणजेच एखादे काम स्वत:च्या बुद्धीच्या वापर करून, स्वत: जबाबदारी घेऊन, अधिकाधिक कष्ट घेऊन यशस्वी पूर्ण केसे तर आपसी कार्यकुशलता व सर्जनशीलता बाढ़ते. नेव्हा ‘स्काय इज द लिमिट अशी परिस्थिती निर्माण होत.

(3) वाळवटांत टिकून राहण्यासाठी कॅक्टस या वनस्पतीला निसर्गाने अनोखी वैशिष्ट्ये बहाल केली आहेत. पावसाळचात मिळेल ते पाणी कॅक्टस स्वतः साठवून ठेवतो आणि कोरड्या हंगामात त्याची वाढ हळूहळू होत राहते. या झाडाच्या मुळाची रचना कमी वेळेत जास्त पाणी शोषून घेई अशी असते. खोलवर मुळे पसरवून कॅक्ट्स सभोवतालच्या भागातील पाणी शोषून घेते. याच बरोबर कॅक्टसची अंगरचना पाणी साठवण्या साठी अनुकूल अशी आहे. कॅक्टसचा कमीत-कमी भाग कोरड्या, उष्ण हवेसमोर येतो. त्याची रचना घडीदार असल्याने पाऊस काळात घड्यांचा उपयोग पन्हाळीसारखा होऊन पावसाचे पाणी थेट मुळांपर्यंत पोहोचते. बाष्पीभवनापासून वाचण्यासाठी या झाडाला पाने नसतात. या सर्व वैशिष्ट्यांमुळे कॅक्टस हा ‘थोड्याशा पाण्यावर कसे वाढावे याचा उत्तम नमुना आहे’ हे विधान यथार्थ वाटते.

विभाग ४ : भाषाभ्यास

प्रश्न 4.
(अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती.
(1) खालील वाक्यांचा प्रकार ओळखा. (2)
(i) तुझ्या शाळेत मराठी दिन साजरा करतात का?
(ii) रनिंगपेक्षादेखील दोरीवरच्या उडया मारा.
(2) कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा. (2)
(i) नेहमी खरे बोलावे. (नकारार्थी करा.)
(ii) तुमची ऊर्जाशक्ती एकत्र करा. (विधानार्थी करा.)
(3) खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा (कोणतेही दोन ): (4)
(i) उत्साहाला उधाण येणे
(ii) गलका करणे
(iii) झोकून देणे

SSC Maharashtra Board Marathi Question Paper 2020 with Answers

(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती.
(1) शब्दसंपत्ती:
(1) खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.
(i) पाऊस =
(ii) मधुर =
(2) खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
(i) सुरुवात ×
(ii) स्तुती ×
(3) शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
पायात चप्पल न घालता ____________
(4) वचन बदला.
(i) गोष्ट
(ii) कल्पना
(2) लेखननियमांनुसार लेखन:
खालील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा.
(i) कवीवर्य नारायण सुर्वे खुप सभा, संमेलने गाजवत.
(ii) तीने माझ्यासाठी प्रचंड कष्ट केले.
(3) विरामचिन्हे:
खालील वाक्यांत योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा.
(i) अरे पण चिट्ठी मराठीतून आहे.
(ii) “काका हे शास्त्रीय सत्य आहे”
उत्तर:
(अ) (1) (i) प्रश्नार्थक
(ii) आजार्थी

(2) (i) कधीही खोटे बोलू नका.
(ii) तुमची ऊर्जाशक्ती एकत्र करावी.

(3) (i) उत्साहाला उधाण येणे – अतिशय आनंद होणे
वाक्य – मुढीचे लग्न हरख्याने राधाबाईच्या उत्साहान उधाण येणे.
(ii) गलका करणे – गोंगाट करणे
वाक्य- परीक्षेचा निकास सांगण्यासाठी शिक्षक वर्गात येताच मुळांनी ळढका केऊ.
(iii) झोंकूण देणे – समरस होणे

(आ) (1) 1. (i) पाऊस वर्षा
(ii) मधुर गोड
2. (i) सुरुवात शेवट
(ii) सुती – निंदा
3. अनवाणी
4. (i) गोष्ट – गोष्टी
(ii) कल्पना – कल्पना

(2) (i) कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा, संभेलने गासवन.
(ii) तिने माझ्यासाठी प्रचंड कष्ट केले.

(3) (i) “अरे, पण शास्त्रीय सत्य आहे’
(ii) काक, हे शास्त्रीय सत्य आहे.

विभाग ५: उपयोजित लेखन

प्रश्न 4.
(अ) खालील कृती सोडवा.
1. पत्रलेखन: (6)
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
SSC Maharashtra Board Marathi Question Paper 2020 with Answers 7

किंवा

2. सारांशलेखन :
विभाग 1 गदय (इ) (प्रश्न क्र. 1 – इ) मधील अपठित उताऱ्याचा १/३ एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.

(आ) खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा.
(1) जाहिरात लेखन:
पुढील विषयावर जाहिरात तयार करा.
शाळेतर्फे मे महिन्याच्या सुट्टीत विदयार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या चित्रकला वर्गाची जाहिरात तयार करा.
(2) बातमीलेखन:
खालील निवेदन वाचून बातमी तयार करा:
SSC Maharashtra Board Marathi Question Paper 2020 with Answers 8

3. कथालेखन:
खालील मुद्दयांच्या आधारे कथा लिहा.
आंतरशालेय क्रीडास्पर्धा – धावण्याची स्पर्धा – शाळेतर्फे वरदचा सहभाग – वरद उत्तम धावपटू-सराव – उत्तम धावपटू तनयशी स्पर्धा प्रत्यक्ष स्पर्धा- चुरशीची स्पर्धा अचानक तनयचा पाय मुरगळणे स्पर्धा सोडून वरदचे मदतीला धावणे स्पर्धा हरूनही वरदचे कौतुक

SSC Maharashtra Board Marathi Question Paper 2020 with Answers

(इ) लेखनकौशल्य
खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा. (08)
1. प्रसंगलेखन:
खालील मुद्दयांच्या आधारे पावसाळयातील एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.
SSC Maharashtra Board Marathi Question Paper 2020 with Answers 9

2. आत्मकथन:
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.
SSC Maharashtra Board Marathi Question Paper 2020 with Answers 10

3. वैचारिक लेखन:
‘युग संगणकाचे’ या विषयावर खालील मुद्दयांच्या आधारे तुमचे विचार लिहा. काळाची गरज- महत्त्व- फायदे/तोटे-सदुपयोग
वरील घटक तुमच्याशी बोलतो आहे अशी कल्पना करा व त्या घटकाचे आत्मवृत्त लिहा.
उत्तर:
(अ) 1. दिपाली माने,
जीवन ज्योती विद्यालय,
नांदगांव,
दिनांक : २२ जुलै, २०xx
प्रिय सुनीता देसाई,
एन-७, ४/२८ सृष्टी निवास,
नांदगांव,

पत्रास कारण की, सर्वप्रथम तुझे अभिनंदन! आपल्या शाळेत महाकवी कालिदास दिनानिमित्त ‘कथाकथन स्पर्धा’ आयोजित केली होती. या स्पर्धेत तू नेहमीप्रमाणेच याही वर्षी ‘प्रथम क्रमांक पटकावून शाळेला यश मिळवून दिल्याने तुझे मी शाळेची ‘विद्यार्थी प्रतिनिधी’ या नात्याने मनापासून अभिनंदन करते.

तुझ्या या यशामुळे शाळेच्या शिक्षकांसह आम्हा सर्वांना आनंद झाला असून कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. श्री अजय लागू यांच्या पस्थितीत कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. उत्तम कांबळे, सुप्रसिद्ध कवी, पत्रकार आणि लेखक यांच्या हस्ते तुला पारितोषिक मिळाल्याने आमचा हा आनंद द्विगुणित झाला आहे. तू आपल्या शाळेची हुशार विद्यार्थिनी असून शाळेच्या यशामध्ये प्रत्येक वेळी तुझा मौलिक वाटा असतो. अभ्यासपूरक व अभ्यासमेतर उपक्रमांत उत्साहाने सहभागी होवून तू नेहमीच शाळेला यश मिळवून देतेस. हा आदर्श आम्हा विद्याथ्यांसाठी महत्त्वाचा आहे. त्यासाठी तुला जे जे प्रेरणा देतात त्यांचेही आभार आणि तुझ्या पुढील वाटचालीसाठी विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपल्या शाळेतर्फे खूप खूप शुभेच्छा.

तुझ्या आई बाबांना सस्नेह नमस्कार व तुझ्या छोट्या भावास अनेक शुभार्शीर्वाद.
धन्यवाद.
कळावे.
आपली.
हस्ताक्षर
(दिपाली माने)
जीवन ज्योती विद्यालय,
नांदगांव
ई-मेल – [email protected]
दीपक माने,
जीवन ज्योती विद्यालय,
नांदगांव.
दिनांक : २७ जून, २०xx
प्रति,
माननीय श्री उत्तम कांबळे,
(माजी संपादक दैनिक सकाळ),
नाशिक
विषय : पारितोषिक वितरण सभारंभासाठी अध्यक्ष या नात्याने आमंत्रण

महोदय,
सर, मी नांदगांव येथील जीवन ज्योती विद्यालयाचा विद्यार्थी प्रतिनिधी’ असून मी शाळेच्या प्राचार्याांच्या अनुमतीने आपणास पत्र पाठवत आहे. आमच्या शाळेत महाकवी कालिदास दिनानिमत्त कथाकथन स्पर्धा नुकतीच पार पड़ली असून 22 जुलै रोजी दुपारी 4.०० वाजता ‘कथाकथन स्पर्धा’ पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन केले आहे. आपली सुप्रसिद्ध लेखक कवी आणि दै. सकाळ मधील संपादकीय कार्य आम्हाला परिचित आहेच, मात्र आमच्या शाळेतील या कथाकथन पारितोषिक वितरण समारंभाचे अध्यक्षपद स्वीकाररून आपण आम्हा विद्यार्थ्यास मार्गदर्शन करून प्रोत्साहन द्यावे अशी आम्हा विद्यार्थ्यांची मनोयन इच्छा आहे.

सर, आपण आमची इच्छा नक्कीच पूर्ण कराल अशी अपेक्षा करतो.
तरकीबद्दल क्षमस्व.
आपला
हस्ताक्षर
(दिपाली माने)
जीवन ज्योती विद्यालय,
नांदगांव.
ई-मेल- [email protected]

किंवा

सारांश लेखन:
संयमाला तुच्छ न मानता त्याद्वारे समाज व स्वविकास साधता येतो. संयम न पाळल्यास सर्वांचेच नुकसान होते. ते टाळल्यास सर्वांचेच नुकसान होते. ते टाळण्यासाठी आपण समाजासाठी आहोत या वाणिकेतून सूर्य, सृष्टी, मेघ, वृक्ष, शेतकरी, विणकरी यांच्यातील समर्पणाचा आदर्श घेऊन या सजीव-निर्जीवांचे आभारी असले पाहिजे. तसेच सृष्टी समाजसेवेसाठी आपले जीवन अर्पण करणे हे आमचे कर्तव्यच मानले पाहिजे.

(आ) 1. जाहिरात लेखनः
यशोदीप विद्यालयतर्फे चित्रकला वर्ग विद्यार्थी व पालकांच्या खास आग्रहानेSSC Maharashtra Board Marathi Question Paper 2020 with Answers 11

सम्पर्क: यशोदीप विद्यालय चित्रकला विभाग, राजापूर
ई-मेल : [email protected]

2. बातमीलेखन
दि. १३ जानेवारी २०xx
सोलापूर निधी.
सोलापूर येथील साने गुरुजी विद्यालयात १३ जानेवारी २०xx रोजी भव्य वार्षिक क्रीडा महोत्सव सोहळा मा. सौ. अपर्णा भोसले (कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे) यांच्या उपस्थितीत व कार्यक्रमाध्यक्ष मा. श्री रोहित बर्वे यांच्या समवेत नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रम सोहळयासाठी ‘साने समाज जागृती’ संस्थेचे संचालक, सेक्रेटरी व इतर मान्यवर सदस्य तसेच साने गुरुजी विद्यालयातील सर्व शिक्षक, प्राचार्य आणि इयत्ता ५वी ते ९वीचे विद्यार्थी तसेच पालकवर्गही उपस्थित होता.

एकूणच या वार्षिक क्रीडा महोत्सवात कवायतीचे वैविध्यपूर्ण प्रकार, मल्लखांबाचे आकर्षक असे प्रकार, क्रीडासाहित्यावर आधारित नृत्यप्रकार आणि प्राचीन लोकसाहित्याची परंपरा जतन करणारे लेझीम नृत्यही सादर केले असले तरी मल्लखांब आणि लेझीम नृत्य हे खास आकर्षण ठरले. वर्षभर संपन्न झालेल्या क्रीडास्पर्धा त्यात सहभागी झालेले आणि घवघवीत यश मिळवणारे विद्यार्थी यांना कार्यक्रमात शेवटी कार्यक्रमाच्या पाहुण्यासी अपर्णा भोसले व कार्यक्रमाध्यक्ष माजी संपादक रोहित बर्वे यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरान्वित करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य यांनी केले तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारीरिक शिक्षक श्री अनुप शिकंजे यांनी केले. उपस्थित मान्यवरांच्या समवेत प्रमुख पाहुणे व अध्यक्षांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाले.

कार्यक्रमाच्या पाहुण्या सौ. अपर्णा भोसले यांनी विनोदी अंकाने कवायतीच्या कारांचे महत्त्व व शारीरिक आरोग्य या विषयी विर्थ्यांना मार्गदश्रन केले. कार्यक्रमाध्यक्ष माजी संपादक श्री रोहित बर्वे यांनी शालेय क्रीडास्पर्धेतून आंतराष्ट्रीय क्रीडास्पर्धेकडे प्रवास कशाप्रकारे करता येईल याविषयीचे मार्गदर्शन विदयार्थ्यांना करत असता त्यांच्या मनातील शंकाचेही निरसन केले. क्रीडाविषयक सरकारी योजनाही विद्यायांना समजावून दिल्याने विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत झाला. या कार्यक्रमात एकूण विद्यार्थी १७०५ सहभागी झाले होते. कार्यक्रमात शेवटी शारीरिक शिक्षिका सौ. अनुजा मायने यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले व कार्यक्रम संपन्न झाल्याचे जाहिर केले.

3. कथालेखन:
जिंकण्यापेक्षा हरण्यातही जिंकणं डिसेंबर महिना म्हटले की आनंदाची पर्वणी असते. मध्येच कुणी तरी गुणगुणत असतं. एक संघ टोळधाडलचल, लदू चला.

उठा उठा, चला चला’ “अंगातली वीरश्री संचारते. मैदान दिसू लागते. सेकंदा सेकंदावर वाऱ्याच्या गतीने धावायचे स्वप्न वरद पाहत होता. इयत्ता पाचवीपासूनच त्याने धावण्याच्या स्पर्धेतील बक्षीस येवलाच शाळेला मिळू दिले नाही. तो जिलास्तरीय, राज्यस्तरीय धावपटू अस्तु परिभ्रममातून बनला होता. त्यामुळे शाळेला, शिक्षकांना, विद्यार्थ्यांना त्याच्याविषयी अभिमान होता. आणि सर्वांच्या सहकार्यमुळे त्याला शाळेविषयी अभिमान होता. आता आंतरशालेय क्रीडास्पर्धा १५ डिसेंबर पासून सुरु होणार त्यामुळे वरद सराव करू लागला. गेल्यावर्षी त्याला एक वर्ष सिनियर असलेल्या उत्तम धावपटू तनयशी त्याची स्पर्धा झाली होती आणि त्याने तनयला अटीतटीने हरवले होते. मात्र याही वर्षी तनय जिंकण्यासाठीच मैदानात उतरणार याची वरदला खात्री होती. स्पर्धेला फक्त आठच दिवस राहिले होते. वरद आता फक्त मैदानावरच दिसू लागला. फरांदे सर त्याच्यावर खूप मेहनत घेत होते. वरदचे हे शाळेतील दहावीचे वर्ष खरे तर त्याचे आई-बाबा, मित्र त्याला स्पर्धेपासून दूर ठेवत होते. परन्तु वरदला शाळेतील शेवटचे वर्ष असल्याने, शाळेला ट्रॉफी मिळवून दयायची होती. सलग पाच वर्षे त्याने शाळेला ट्रॉफी मिळवून दिलीच होती. अंग मोडून तो सराव करत होता. मेहनत करत होता.

25 डिसेंबर वरदचा विजयाचा दिवस. ट्रॉफी मिळण्याच्या जल्लोशाच्या स्वप्नात तो बालेवाडी मैदानात उतरला. सूचना मिळाली. स्पर्धा सुरु झाली. जसे ठरवले तसेच घडत होते. पुणे जिल्हातील 40-45 शाळेतील धावपटू बालेवाडी मैदानात अवतरले होते. एकूण गोधक होते होते. उत्तम धावपटू असलेला तनयही जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरला होता. वरदने शिक्षकांच्या नजरेतून आशीर्वाद घेतला अन् वाऱ्याच्या वेगाने धावू लागला. कितेक धावपटू मागे पडले. चुरशीची स्पर्धा सुरु झाली. मैदानात चार धावपटू धावत होते. वरदने दोनांना मागे टाकले. आता तनय …..F for Focus चेअर आपल्या जल्लोशात वरद तनयच्या जवळ जवळ जाऊ लागला आणखी काही अंतर चारशे मीटरची स्पर्धा आता फक्त पाच ते सात मीटर बघता बघता वरदने तनयलाही मागे टाकले. विजय जिंकणे, यश सर्वच वरदच्या हाती स्वाधीन झालं होतं. आता धावपट्टीला भिडायच ……. मात्र अचानक आई ऽऽऽ ग ऽऽऽ असा आवाज वरदच्या कानी पडला तसे वरदने मागे वळून पाहिले. तो तनय खाली पडलेला. हाताता पाय धयन ओरडत होता. क्षणाचाही विलंब न करता वरद तसाच माघारी वाऱ्याच्या वेगाने तनय जवळ गेला. तो का ओरडतोय ते पाहिले. तनयचा पाय मुरगळला होता. तो वेदनेमुळे ओरडतोय हे त्याच्या लक्षात येताच त्याने आपल्या हाताच्या आधाराने तनयला आधार दिला. त्याच्या पायावरून हळूच हात फिररवत तनयला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. शिक्षक जवळ आले. त्यांनी नियला मैदानरातून बाहेर घेतले. डॉक्टर आले. औषधोपचार झाले.”

एव्हाना वरद स्पर्धा विसरला होता. परीक्षक त्याचे आले. आश्चर्यजनक कौशल्य, त्याचा विजय आणि अचानक तो विजयापासून दूर जाऊन मित्राच्या मदतीला धावला होता. हे सर्व पाहत होते. वरद भानावर आला. स्पर्धेचा निकाल जाहीर होत होता. आंतराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांनी निकाल जाहीर केला. यावर्षी वरदला पहिले काय पण तिसरेही बक्षीस मिळाले नव्हते. आपल्या मुळे शाळेला बक्षीस मिळाले नाही याची वरदला खंत वाटत असतानाच वरदच्या नावाची घोषणा झाली आणित्याला वैयक्तिक यश म्हणून नेहमीच्या ट्रॉफीपेक्षा मोठी ट्रॉफी मिळाली. सर्वत्र वरदचेच कौतुक होत होते. ती ट्रॉफी म्हणचे वरदच्या संवदेनशीलतेचे, शाल्यातील माणुसकीचे प्रतीक होते. आज वरद जिंकण्यापेक्षाही हरण्यात जिंकला होता. तनय आणि वरदने ट्रॉफीचे हात उंचावताच बालेवाडीच्या मैदानात एकूण आवाज येवू लागला. वर ऽऽदवरऽऽद……

SSC Maharashtra Board Marathi Question Paper 2020 with Answers

(इ) 1. लेखनकौशल्य:
पावसाळयातील एक दिवस
सरीवर सरी आल्या गं
सचैल गोपी नाल्यागं
गोपी झाल्या भिजून चिंब
थरथर कापती निंब-कदंब – बा. भ. बोरकर

हीच नाही तर अशा किती तरी कविता पावसाला माणसाठी संवाद साधायला लावतात. त्याला सजीव करतात आणि तोही मानवी जीवनाशी अतूट नात साधतो. जून ते सेप्टेंबर हा पावसाळा ऋतू मनात घर करून बसणारा. सुरुवातीला पावसाची चातकासारखी वाट पाहायला तो लावतो खरा. कधी तो सहन सरी बरसून मनाला आल्हाद देतो नर कधी जीवघेणा खेळ खेळतो. मात्र त्याची वाट पाहण्यातील मजा काही औरच असते. सुरुवातीचा पाऊस तळ हातावर झेलला जातो. पावसात शरीराने आणि मनाने भिजता येते. मृदूगंध मनाला वेरणे करतो. सर्वत्र हिखळ पसरते.

हिरवे हिरवेगार शेत हे सुंदर घाळीचे
झोके घेते कसे चहुकडे हिरवे गालीचे – भा. रा. तांबे

किंवा

फडफड करुनि भिजले अपुले पंख पाखरे आवरती
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बगडती – बालकवि

हे पावसाळी वातावरण मनाला मंत्रमुग्ध करून टाकते. अशा पावसाचे मनोश दर्शन मी माझ्या घराच्या बालकणीतून घेत होते. टेरेसवर जावून घरापासून थोडच्या अंतरावर असलेली हिरवीगार शेती पाहून मन प्रफुल्लित होत होते. शेतकरी गाणं गात शेतीची मशागत करत होते. नेहमीपेक्षा यावर्षी पावसाची दमदारी जास्त राहील असे वाटत होते आता दुष्काळाचा प्रश्न मिटेल. शेतीने आपल्यास सुबत्ता येईल असे वाटत होते. पानी फाउंडेशन, N & O अशा काही संस्था पाण्यासाठी गावे दत्तक घेऊन पाणी वाचवयाला प्रयत्न करत होते. आता हे कुठेतरी थांबेल असेही वाटत होते.

मात्र सेप्टेंबर निघून गेला तरी पाऊस थांबायचे नाव घेईना तो आपला संततघार को सळत होता.

नको नको रे पावसा असा अवेळी थिंबका
घर मागे चंद्र मोली आणिदरात आली – कवी इंदिरा संत

अशा संवेदनशील शब्दांचाही त्यावर परिणाम झाला नाही. उलट तो थयथय नाचतच राहिला. बेबाक होऊन कोसळत राहिला. कोल्हापूर, सांगली, औरंगाबाद, पुणे सारख्या शहरात पुराग्रस्त स्थिती झाली. शेते पाण्याखाली गेली. फळभाज्यांची नासधूस झाली. निसर्गाचा प्रकोप सुरु झाला.

सायंकाळची वेळ पावसाची रिमझिम चालूच होती. मी भाजी आणण्यासाठी घराबाहेर पडले. भाजी खरेदी झाली. घरी परतायचं पण मैत्रीण भेटली. बऱ्याच गप्पा सुरु झाल्या वेळेचे भान राहिलेच नाही. आता पावसाचा जोर वाढला सर्वत्र सतर्कतेचा इशारा दिला जात होता. पण मी काय घराजवळ होते त्यामुळे सुरक्षित होते. बघता बघता साडेसात वाजले. अंधार पडू लागला. लाईट गेलेली. विजांचा कडकडाहट, मनात भीती वाढू लागली. आता आम्ही दोघींच्या ऐवजी पंधरा-वीसजन झालो. जो तो पाऊस पाऊस धांबण्याची वाट पाहात होता व स्वतःला सुरक्षितही ठेवत होते. मात्र उभ्या असलेल्या मनीषाची अस्वस्थता वाढली. रस्त्यावर पाणी वाढत होते. तिची दोन गोनिरवाणी छोटी मुले तिची वाट पाहात होती. ती सुरक्षित ठिकाणी असूनही अस्वस्थ होती. डोक्यावरून पाणी वाहत होते. मी समजवण्याचा प्रयत्न केला पण ती ऐकतच नव्हती. तिने गाडीला किक मारली अन तशा पावसात घराची वाट धरू लागली. एकच गोंधळ तिला सर्वजण त्यापासून सावध करत होते. समजावत होते. पण तिने ऐकलेच नाही.

तिला नांदेड सिटीत जायचे होते. वैकुंठ भूमी जवळील शार्टकट रस्ता पकडला जीवाच्या आकांताने ती आपल्या पिलाकडे धाव घेत होती आणि अचानक वैकुंठ भूमीची सुरक्षित भिंत कोसळली आणि जोराचा पाण्याचा लोढा आला अन रस्त्यावरील सर्वांनाच ओलं करत सुटला भोजमाती त्यातून सुटली नाही. आम्ही खाली होतो ते त्याच बिल्डिंगच्या टेरेसवार जाऊन डोळे मोठे करून रस्त्याकडे पाहात होता. सर्वत्र अंधार आणि माणसांचा आक्रोश, विजांचा कडकडाट, टू व्हिलर, फोर व्हिलर नसणे, भातुकलीच्या खेळाच्या आधारे कुटल्या कुठे बसत गेली आणि माणसेही मन सुन्न करणारे ते दृश्य आणि तरीही धयचय, नाचणारा, कोसळणारा तो पाऊस जीवघेणा ………… मनातून न जाणारा पण हे ती खरच की निसर्गाचा विरुद्ध माणूस गेला की त्याला निसर्गाच्या प्रकोपालाही सामोरे जावे लागणारच. पण हा पावसाळयातील एक दिवस ………. अविस्मरणीय दिवस ठरला.

पुस्तकाचे आत्मकथन
चांगले पुस्तक, हे एक प्रकाराचे चांगले शिक्षकच होत आहे. हे म्हटले जाणे ते चुकीचे नाही आज संगणक युगात मानव ई- पुस्तकापर्यंत जाऊन पोहोचला असला तरी तो जेव्हा मागे वळून पाहतो किंवा माझ्या जन्माचा इतिहास शोधतो तेव्हा त्याला सुमारे. (२८०० वर्षे ख्रिस्तपूर्व) जावे लागते. पण नकोस ‘पुस्तक वाचा, ज्ञान वेचा’ ही मी तुमच्यासाठी महत्त्वाची क्लृप्ती देतोय. म्हणजे तुम्हाला माझ्याविषयी खूपच काही कळेल. आता हेच पाहाना प्राचीन बाबी म्हणजे मुद्रण कलेच्या शोधापूर्वी धर्मपत्र, दगड, माती धातूची पत्रे वा झाडाची पाने वा सालीपासून बनविलेल्या पानांचे संकलन म्हणजे पुस्तक मात्र औदयोगिक क्रांतीनंतर मुद्रणकलेचा शोध लागला. कागदाचा शोध लागला अन् लिखित व मुद्रित साहित्याला पुस्तक म्हटले जाऊ लागले. तर इलेक्ट्रानिक रूपात पुस्तकास ई-पुस्तक असे म्हटले जाते. हा माझा एक संक्षिप्त परिचय.

मित्रांनो, ग्रंथ हे गुरू असेही माझ्याबद्दल म्हटले जाते. कारण जो माझ्याशी प्रेमाने वागतो. माझ्याशी मैत्री करतो त्याला मी भरभरून देतो. तो माझ्यापासून रिक्त हाताने जाऊच शकत नाही कारण ‘पुस्तक वाचा, ज्ञान वेचा’ याचा तुम्हाला प्रत्यानुभव नक्कीच येईल. केव्हा ? जेव्हा तुम्ही पुस्तक हाती घ्याल तेव्हा. मी खरेतर बुद्धिवंतांना बौद्धिक खाद्य पुरवितो. वैचारिकांना विचारपूर्वक बनवतो. मनोरंजनवाल्यांचे मनोरंजन करतो. अगदी तुमच्या भावनांना, संवेदनांनाही स्पर्श करतो. त्यामुळेच माझ्या अंतरंगातील दुःख काही वेळी तुम्हाला तुमचेच वाटते ना ? तर कधी माझ्यातील विनोद वाचूनही तुम्ही मनमुराद हसता. हे पाहून मलाही आनंदच होती.

मात्र आज मला राहून राहून वाईट वाटते आहे कारण आज कित्येक तरी मित्र माझ्याकडे ढुंकूनही पाहात नाहीत मी ग्रंथालयात पडून असतो. तुमची वाट पाहतो. मला कुणाची ना कुणाची ज्ञानतृप्ता भागवायची असते पण तुम्हाला कधी याची जाणीवच होत नाही. ग्रंथालय माझे घरच आता ओस पडू लागले आहे. तिथे गोंधळ नसतो, गजबजाट नसतो, चर्चा नसते. सर्वत्र फक्त शुकशुकाट! मी खूप विचार केला तेव्हा माझ्या लक्षात आले की तुम्ही सध्या ई-पुस्तकाच्या प्रेमात पडले आहेत. ते पण खरं सांगू मित्रांतो, पुस्तक हातात घेऊन वाचन करताना जी मजा येते ती त्यात नाही. वाक्य अधोरेचित ठेवणे. वाचनचा कंटाळा येतो तेव्हा त्यात मोरपिस ठेवणे किंवा एखादे पिंपळपान! ई – पुस्तकातून ज्ञानसाठा मिळेलहा परंतु प्राचीनतम ज्ञान माझ्याकडून तुम्हाला नक्कीच मिळेल. कोणत्याही त्रासाविणा कारण.

पुस्तक म्हणजे पुस्तक आहे.
चमकत्या दोलल्या ज्ञानाचे ते व्यासपीठ आहे. जो या व्यासपीठावर येईल तो ज्ञानमयी नक्कीच होईल. माझ्या परिसस्पशाने तुमच्या वयाचे जीवन सोनेच होईल. हे सांगायलाच नको. माझ्यामुळे घडवलेले आयडल्स तुमच्यासमोर आवतीभोवती आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, रविन्द्रनाथ टागोर, साने गुरुजी, वि. दा. सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस असे कित्येकही या सर्वांनी त्यांच्या त्यांच्या परीने माझा उपयोगच करून घेतला. त्याचा फायदा संपूर्ण देशाला झाला. कारण माणूस घडविणे हाच माझा मूलमंत्र व धर्म आहे.

SSC Maharashtra Board Marathi Question Paper 2020 with Answers

युग संगणकाचे…………
एकोणीसावे शतक हे विज्ञानयुग तर एकविसावे हे ‘संगणक युग’ म्हणून आपणास परिचित झाले आहे. चार्लस बॅबेजने निर्माण केलेले हे उपकरण संपूर्ण जगात व्याप्त असून दिवसाची सुरुवात अन् शेवटही याच उपकरणाद्वारे होतो. म्हणजे संगणक हे मानवी जीवनाचा भवितव्य भाग बनले आहे. अर्थात संगणकाशिवाय कोणतेही काम होत नाही म्हणून आजचे युग संगणक युग आहे असे समजले जाते. ते गैर नाही कारण बँकेचे व्यवहार, खरेदी, प्रवासाची तिकिटै, जेवण घरी मागविणे, हे घरबसल्या कामे केली जातात. घरातील कामे, जगाच्या काना कोपऱ्यातील कामे, परग्रहावरील यानाचे नियंत्रण करणारे हे यंत्र लोकांना काम टाळायलाही प्रभावी कारण पुरविते जसे की बँकेच्या व्यवहारासाठी गेले असता. सिसिटम डाऊन, असे उत्तर मिळतय तासननास वाट पाहात बसावे लागते आहे, ‘काही तरी करा’ म्हटले तरी उत्तर एकच- सिस्टिम डाऊन माणूस अशा उत्तराने नक्कीच वैतागल्याशिवाय राहात नाही. अशा कार्य करणाऱ्या प्रणालीला Operating system असे म्हणतात.

अदयस्थितीचे युग हे संगणक युग असून संगणकाचा मानवी जीवनावर नको तितको परिणाम झाला आहे. चिन्हांवर प्रक्रिया करणारी व्यवस्था असूनही रचनेद्वारे माहिती स्वीकारणे साठविणे आणि संस्कारित करणे. निकाल वा उत्तरे तयार करणे अशा सूचनाबरहुकूम पायऱ्या पायऱ्यांनी ते केले जाते. रेल्वे, विमान, आरोग्य, बँक, उदयोग धंदे, शिक्षण, संशोधन, अंतराळ, विमा अशा विविध प्रकारच्या क्षेत्रात संगणकाद्वारे कार्य केले जाते.

संगणक कार्य प्रणालीमुळे कामाचा प्रचंड वेग वाढला आहे. मोठ्या प्रमाणात माहिती साठविली जाते. सूचनांनुसार संगणकाकडून काम करवून घेतले जाते. क्रमवार सूचना दिल्या जातील. अशी कामे करून घेता येतात. संगणक यंत्र जलद व मोठ्या क्षमतेने प्रचंड काम करते. सर्व क्रियांमध्ये सातत्य व विश्वासार्हच दिसून येते. संगणकावर भावनात्मक परिणाम होत नाही. संगणकाला कशाचीही गरज नसते मात्र पुरेसे चार्ज होणे महत्त्वाचे असते.

महत्वाचे म्हणजे उच्चशिक्षणामध्ये ऑनलाइन परीक्षा ही संगणकाद्वारेच घेतली जाते. तसेचा आमंत्रण पत्रिका, लग्नपत्रिका. महत्त्वाचे संदेश, ईमेलद्वारेही पाठविता येतात. त्यामुळेच संगणक म्हणजे मानवाचा सोबती झाला आहे. त्यांच्याशी आपले नातेही अतूट झाले आहे.

SSC Maharashtra Board Marathi Question Paper with Answers

Leave a Comment